नगर । प्रतिनिधी - नगर शहरात घरासमोर, गेटच्या आत लावलेल्या दुचाक्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच चारचाकी वाहनेही लांबविण्याचे प्रकार वाढत चालले असून याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचे पहायला मिळत आहे.
नगर शहरातील विविध भागात दररोज अनेक दुचाक्या लांबविल्या जात आहेत. घरासमोरुन दुचाक्या चोरी होत असल्याने आता दुचाक्या लावायच्या कुठे असा सवालही उपस्थित केला जात नाही. नगर शहरात दुचाक्याही सुरक्षित राहत नसतील तर पोलिसांचा चोरट्यांना धाक-दरारा राहिलाच नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
दुचाकी चोरीची किरकोळ घटना असल्याने पोलिस याकडे कायमच दुर्लक्ष करतात. यामुळे दुचाकी चोरांचे फावत असून त्यांचा सुळसुळाट वाढतच आहे. नगर शहरात दुचाक्यांसह आता चारचाकी वाहनेही चोरुन नेली जात आहेत. पोलिस केवळ गुन्हा दाखल करुन घेतात. त्यानंतर पुढे काहीही होत नाही. आता पोलिसांनी या दुचाकी चोरांकडे मोर्चा वळविण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment