Tuesday, 26 February 2019

पोलीस भरतीत होणार प्रथम लेखी परीक्षा


नगर । प्रतिनिधी- पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आता प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, असे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुध्दिमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता, पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणार्‍या दुर्घटनना या बाबी विचारात घेऊन राज्य शासनाच्या गृह विभागाने नुकताच एक आदेश काढला आहे. त्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणार्‍या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमदेवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणार असल्याने भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. त्यामुळे जिल्ह्याबारहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केेलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल.

No comments:

Post a Comment