नगर । प्रतिनिधी -
शहरालगत असलेल्या सीना नदी पलीकडील काटवन खंडोबा, गाझीनगर भागात 3 महिन्यांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्याचा टँकर आधार ठरत आहे. नळाला पाणी येत नसल्याने टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे. चार ते पाच दिवसांआड पाण्याचे टँकर येत असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
गाझीनगर येथे दोन्ही बाजूंनी पाईपलाईन टाकण्यात आलेली असून, काही मोजके नळ सोडले तर मुख्य रस्त्याच्या आतील भागात असलेल्या नागरिकांच्या नळाला पूर्ण दाबाने पाणीच येत नाही.
हा त्रास 3 महिन्यांपासून नागरिक सहन करीत असून, ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. यामुळे पाणीप्रश्नावरुन नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे.
No comments:
Post a Comment