Tuesday, 5 March 2019

एमआयडीसीतील व्ही. एस. इंजिनिअरिंग कंपनीतील कामगारांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे सेफ्टी मॅनेजर चंद्रकुमार भंडारी व नेव्ही रिटायर्ड अनिल अकोलकर यांनी व्ही. एस. इंजिनिअरिंग कंपनीतील कामगारांना आपली सुरक्षा कशी करावी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी विश्वनाथ पोंदे, किशोर रेणावीकर, मुकुंद पंत, अजित चाबूकस्वार, दिलीप गंधे उपस्थित होते. 
कामगारांनी आपली वैयक्तिक सुरक्षा कशी करावी, तसेच कंपनीचीही सुरक्षितता कशी करावी, याबद्दल चंद्रकुमार भंडारी यांनी सखोल माहिती दिली. कंपनीत काम करताना कामगारांनी स्वतःला काहीही इजा होऊ नये, यासाठी जास्त काळजी घ्यावी. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह यशस्वी झाल्यासारखा होईल, असे ते म्हणाले.
अनिल अकोलकर म्हणाले की, आगीचे तीन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे कपडे, प्लास्टिक व कचरा यापासून लागलेली आग, दुसर्‍या प्रकारची म्हणजे लिक्विड, केमिकल व गॅस यापासून लागलेली आणि तिसरा प्रकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक, मशिनरी यापासून लागलेली आग. आग लागूच नये, यासाठी कामगारांनी कंपनीत काम करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच आग लागली तर घाबरून न जाता तीन मिनिटांच्या आत आग विझवण्याचा प्रमत्न करावा.

No comments:

Post a Comment