Tuesday, 26 March 2019

भाजप सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही ः शरद पवार


नगर । प्रतिनिधी-
सरकारने जाचक जीएसटी कर आणून व नोटाबंदी करुन संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आणली. राफेलचा घोटाळा, संरक्षण खात्यातीलही महत्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक असे सर्वचजण या भाजपच्या सरकारच्या काळात अडचणीत आले आहेत. अतिरेकी हल्ला होऊन चाळीस निरपधार सैनिक मारले जातात, तेव्हा कुठे गेली होती ही 56 इंच छाती, अशा भाजपाच्या सरकारच्या हातात आपला भारत देश सुरक्षित नाही. त्यामुळे नागरिकांनी याचा विचार करावा. नगरचा उमेदवार कसा असावा, हे ठरवतांना मी विचार केला की, उमेदवार नम्र असावा, आलेल्यांशी माणुसकीने वागणारा, मिळालेल्या पदाची व अधिकाराची हवा डोक्यात गेलेली नसावी. यासर्वांचा विचार करुन आमदार संग्राम जगताप सारख्या तरुण कार्यकर्त्यास नगर दक्षिणची उमेदवारी दिली. आता जनतेने ही निवडणूक हातात घेऊन या विकासाचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवारास निवडून द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
खा. शरद पवार सोमवारी दिवसभर नगरमध्ये उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी थांबले होते. सायंकाळी बडीसाजन मंगल कार्यालयात अहमदनगर शहर व्यापारी मंडळाच्यावतीने आयोजित  शहरातील व्यापारी उद्योजकांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, पुणे मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष पोपट आस्तवाल, वालचंद संचेती, राजेश फुलपगार, आ.जितेंद्र आव्हाड, आ. अरुण जगताप, आ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. दादाभाऊ कळमकर, उमेदवार आ. संग्राम जगताप, निरिक्षक अंकुश काकडे, निवृत्ती आरु, सुजित झावरे आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.
उमेदवार संग्राम जगताप म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र निर्माण केले गेले. काही जण नगर दक्षिण भागात अतिक्रमण करुन ताबा घेण्याच्या प्रयत्नात होते. कार्यकर्त्यांवर दमदाटी करतील असे वाटत होते.
मात्र आता आम्ही आहोत, आता घाबरायची गरज नाही. आता या उत्तेरेतील अतिक्रमाला तेव्हढ्याच ताकदीने परत पाठवून देण्याची ताकद आपल्यात आहे.प्रास्ताविक मेळाव्याचे संयोजक सुमतीलाल कोठारी यांनी केले. मेळाव्यास पेमभाऊ बोथरा, ठाकूर नवलानी, अनिल पोखरणा, बाळासाहेब विधाते, लिंबाशेठ नागरगोजे, तुकाराम तावरे, श्याम मेघांणी, राजेंद्र बोथरा, राजेंद्र कटारिया, सतीश इंदाणी, गोपाल मनियार, आनंदराम मुनोत, संजीव गांधी, मोहन बरमेचा,राजेंद्र चोपडा, संजय चोपडा, संजय बोरा उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी राजू शेटीया, संजय ताथेड, बाळू धाडिवाल, अजित गुगळे, राजकुमार ओसवाल, राजेंद्र कटारिया, पप्पू मुंदडा आदिंनी परिश्रम घेतले.

महापालिकेत कर्मचार्‍यांचा संप सुरु


नगर । प्रतिनिधी-
महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभागात आऊटसोर्सिंगद्वारे विविध कर्मचार्‍यांच्या भरतीला विरोध करत कर्मचारी युनियनने दिलेल्या संपाच्या नोटिसीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून (दि.26) मनपाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी महापालिकेत कर्मचार्‍यांची बैठक घेऊन आंदोलनाचा सुरूवात केली आहे. दरम्यान, संपामुळे ऐन मार्च अखरेच्या पार्श्वभूमीवर कामकाज ठप्प झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
घनकचरा विभागात सॅनिटरी इन्स्पेक्टर, संगणक ऑपरेटर व अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी मनपाने खासगी कंत्राटदाराकडून निविदा मागविलेली आहे. कर्मचारी युनियने याला आक्षेप घेत कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्तीने ही पदे भरण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात युनियनने नोटीस बजावून 26 मार्चपासून संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही. युनियनशी साधी चर्चाही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविलेली नाही. त्यामुळे नोटिसीप्रमाणे संप सुरू करण्यात आल्याचे लोखंडे यांनी सांगितले.कर्मचार्यांच्या कालबध्द पदोन्नत्तीच्या फरकाच्या रकमाही मनपाने दिलेल्या नाहीत. सुमारे पावणेदोन कोटी रुपये थकीत आहेत. मनपाने 10 लाख, 20 लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. मात्र, सर्व रकमा तात्काळ मिळाव्यात, अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. याबाबतही आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता. प्रशासनाशी या विषयावर चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे आजपासून संप व आंदोलन सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

आता आपली लढाई दूष्ट प्रवृत्तींशी : डॉ. सुजय विखे


पारनेर । प्रतिनिधी-
पारनेर तालुक्याने विखे पाटील परिवाराच्या राजकीय, सामाजिक वाटचालीला कायम साथ दिली. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांना साथ देऊन, प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी या तालुक्याने ठेवली. मात्र आता प्रश्नांबरोबरच आपली लढाई ही दृष्ट प्रवृत्तींशी आहे, अशा शब्दात डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पारनेर येथे आयोजित भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती विजयराव औटी, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहकले आदी उपस्थित होते.
सुजय विखे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने मला पक्षात सामावून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात फडणवीस सरकारनेही अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा दिलासा दिला. त्यामुळेच आपण मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या माध्यमातून दक्षिण जिल्ह्याचा कायापालट करू, असेही ते म्हणाले.
विजयराव औटी म्हणाले की, पारनेर तालुक्यात स्व.खा.बाळासाहेब विखे पाटील यांना माननारा मोठा वर्ग आहे. या कुटुंबाला मोठी परंपरा आहे. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष असून, तालुक्यातून विखेंच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक; थोरातांचाही यादीत समावेश


नगर । प्रतिनिधी-
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादीर जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसनेही महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा सुजय विखे पाटील यांच्यासाठी न सोडल्यामुळे विखे पाटील सध्या नाराज आहेत. काँग्रेसच्या पत्रकार परिषदा, सभा, मेळाव्यांपासूनही ते दूर राहात आहेत. नगरमध्ये आपण प्रचाराला जाणार नाही, असेही याआधीच विखेंनी जाहीर केलेले आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील भाजपाच्या चिन्हावर नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत. दुसरीकडे विखे पाटील यांच्यासह माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही नाव स्टार प्रचारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांमध्ये अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन, प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगडी यांचीही नावे आहेत. महाराष्ट्रातील विविध समूहांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी तयार केल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची ही यादी प्रसिद्ध केली असून, हीच यादी निवडणूक आयोगालाही सुपूर्द केली जाणार आहे.

Saturday, 23 March 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कापड बाजारामधील प्रचारफेरीस व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी आ.अरुण जगताप यांनी नगरमधील कापड बाजार, दाळमंडई, आडते बाजार या प्रमुख बाजारपेठेतून प्रचारफेरी काढली. भिंगारवाला चौकातील जैन मंदिरात मंगलपाठ करुन या प्रचारफेरीस सुरुवात झाली. आ.अरुण जगताप यांनी कापड बाजारामधील सर्व दुकानदार व्यापार्यांच्या गाठी-भेटी घेऊन नगर दक्षिणेत परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन केले.
कोहिनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनात संचालक प्रदीप गांधी यांनी आमदार अरुण जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोहिनूर दालनामधील दोनशेहून अधिक कर्मचार्‍यांशी आ.अरुण जगताप यांनी संवाद साधला.  तसेच ठिकठिकाणी व्यापारी वर्गाच्यावतीने आ.जगताप यांचे उत्स्फूर्त स्वागत करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अ‍ॅड.अशोक कोठारी, प्रदीप गांधी, प्रकाश पोखरणा, सुभाष पोखरणा, किरण व्होरा, विनोद नारंग, बन्सी आसनानी, राजेंद्र बोथरा, अनिल पोखरणा, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्रेणिक शिंगवी, अजित बोथरा, श्याम देडगांवकर, सुमतीलाल कोठारी, फारुक रंगरेज, रमेश सोनीमंडलेचा, अशोक पितळे, ठाकूर नवलानी, मनोज कटारिया, बाळू धाडिवाल, नरेंद्र बाफना, राजू ओसवाल, अजित बोथरा, संजय ताथेड, मुन्ना चमडेवाला, विपुल शेटीया, पप्पू मुंदडा, हरिष खुबचंदानी, माणिक विधाते, संजय बोरा, ज्ञानेश्वर रासकर, राजेंद्र चोपडा आदी प्रमुख व्यापार्‍यांसह कापड बाजारामधील व्यापारी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी





नगर । प्रतिनिधी - सावेडी गावात सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवाचे हे 19वे वर्ष होते. यानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच मोठ्या उत्साहात परिसरात मिरवणूक ही काढण्यात आली होती. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. या मिरवणुकीत लेझीमपथक, टाळ, वीणा, मृदंगाचा गजर करण्यात आला. 
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, उद्योजक किशोर वाकळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णु काळे, बाळासाहेब वाकळे, शंकर बारस्कर, अशोक वाकळे, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव आदी उपस्थित होते. महापौरांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. महापौर व नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी फुगडी खेळली.सर्व भाविक मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी - मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढाया करतांना अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरुन त्यांनी तत्कालीन साम्राज्यशाहींशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. जनतेची काळजी घेणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. आज त्यांच्या आदर्शवरच आपणास काम करायचे असून, जनतेच्या प्रश्नांसाठी लढले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे डॉ.सुजय विखे यांनी केले.
माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपाचे डॉ.सुजय विखे व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवाजी कदम, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, जगन्नाथ आंबेकर, प्रफुल्ल सावंत, अप्पू बेद्रे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले, त्याकाळी  आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदार आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार, किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासकाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. असा राजा पुन्हा होणे नाही. आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदीनी आपले मनोगत व्यक्त केले. यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तोफा, मावळे, पोवाडा,  झेंडे यामुळे वातावरण शिवमय झाले होते.

बेरोजगार दिव्यांगांचा आशाकिरण


नगर । प्रतिनिधी - मूकबधीर-अस्थिव्यंग-अल्पदृष्टी दिव्यांगांचे बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अनामप्रेम मागील 5 वर्षापासून काम करीत आहे. या प्रकारच्या दिव्यांग प्रौढ मुला-मुलींना नोकरीपूर्व प्रशिक्षण देणे, त्यांना प्रशिक्षित करून कंपन्या, मॉल्स, रिटेल आणि एम.आय.डी.सी मध्ये नोकर्‍या उपलब्ध करून देण्याचे मिशन स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्था चालवत आहे. हे नोकरी प्रशिक्षण केंद्र 2 महिन्यांचे मोफत निवासी ट्रेनिंग देते. यानंतर या दिव्यांगांना खाजगी उद्योग क्षेत्रात नोकरी मिळवून देते. अनामप्रेमच्या नोकरी केंद्रामुळे 400 दिव्यांग स्वावलंबी झाले आहेत. याच केंद्राच्या 20 व्या प्रशिक्षण केंद्राच्या कोर्सची प्रवेशपूर्व मुलाखत येत्या 2 एप्रिल रोजी आयोजित केली आहे. येत्या 2 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नगर शहरातील अनामप्रेमच्या गांधी मैदान, स्नेहालय भवनमागे, अहमदनगर या कार्यालयात या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. गरजू-होतकरू दिव्यांग मुला-मुलींनी याकरिता प्रवेश घ्यावा, असे आवाहन अनामप्रेमच्या वतीने करण्यात ाले आहे.
दोन महिने चालणारे हे प्रशिक्षण नगर शहरापासून 15 किमी अंतरावर असणार्‍या  निंबळक गावातील सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पातील रविनंदा संकुलात दिले जाते. पूर्णतः मोफत असणार्‍या या प्रशिक्षण केंद्रातून इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणक प्रशिक्षण, खाजगी उद्योग क्षेत्रात लागणारी विविध कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास आदी घटक शिकवले जातात. हैद्राबाद येथील युथ फॉर जॉब या सामाजिक कंपनीद्वारे हे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत प्रशिक्षित स्टाफ याकरिता अनामप्रेमच्या प्रकल्पात उपलब्ध आहे. सांकेतिक भाषा तज्ञ, इंग्रजी व व्यक्तिमत्व विकास अभ्यासक, प्लेसमेंट ऑफिसर आदी स्टाफ युथ फॉर जॉबच्या मार्गदर्शनात अहोरात्र कार्यरत आहे. दिव्यांग मुला-मुलींच्या रोजगारासाठी संगणक शिक्षणाचे महत्व ओळखून अनामप्रेमने पूर्णतः व अल्पशा अंध मुला-मुलींना देखील संगणक प्रशिक्षण कोर्स सुरु केला आहे.  गरजू-होतकरू बेरोजगार अपंग-अस्थिव्यंग-मुकबधीर-अंशतः अंध मुला-मुलींसाठी प्रवेशपूर्व मुलाखती घेऊन या प्रकल्पात प्रवेश दिला जात आहे. अनामप्रेम दिव्यागांचे शिक्षणातून पुनवर्सनाचे माध्यम बनावे असा स्नेहालयचा प्रयत्न आहे.
 गेल्या 3 वर्षामध्ये अनामप्रेमच्या या  ‘युथ फॉर जॉब’नोकरी प्रशिक्षण केंद्र 450 दिव्यांगांना प्रशिक्षित केले आहे. प्रशिक्षित दिव्यांगांपैकी 400 दिव्यांग मुला-मुलींना रोजगार मिळाला असून ते स्वावलंबी झाले आहेत. त्यातील अनेक दिव्यांग विवाहित झाले असून उत्तम संसार ते करीत आहेत. नगर, पुणे, मुंबई, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत या प्रशिक्षित दिव्यांगांना नोकर्‍या मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. स्नेहालय परिवाराने येथे दिव्यांगांसाठी टेलरिंग उत्पादन युनिट देखील सुरु केले आहे. सर्व प्रकारच्या बेरोजगार दिव्यांगांना रोजगार कसा मिळेल यावर अनामप्रेम टीम काम करीत असून नगर जिल्ह्यातील प्रत्येक बेरोजगार दिव्यांग रोजगारक्षम होण्यासाठी आगामी काळात अनामप्रेमचे प्रयत्न आहेत. याकरिता या विषयावर डॉ.प्रकाश शेठ, डॉ. सायली सोमण, इंजिनियर अजित माने, सामाजिक कार्यकर्ते दीपक बुरम, रामेश्वर फटांगडे, उमेश पंडूरे, अजित कुलकर्णी आदी स्नेहालय कार्यकर्ते  संशोधन करीत आहेत. अधिक माहितीसाठी 7350013805/7350640303 या क्रमांकावर गरजू-बेरोजगार दिव्यांग मुला-मुलींनी संपर्क साधावा. प्रशिक्षणातून स्वत:चे जीवन बदलावे, बेरोजगार दिव्यांगापर्यंत ही केंद्राची माहिती पोहचवण्याचे आवाहन अनामप्रेमने केले आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. जुन्या बसस्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, लकीशेठ खुबचंदानी, नीलेश बांगरे, संजय बुधवंत, लहू कराळे, प्रतीक शिंगवी, सुरेश शहाणे, चंदूशेठ औशीकर, शिवाजी कराळे, सोनू जगताप आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा.माणिक विधाते म्हणाले की, महापुरुषांची जयंती फक्त घोषणा देवून वाद्यांवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार आत्मसात करुन प्रेरणा घेण्यासाठी आहे. 
छत्रपतींच्या विचारांनी काम करणारे राजकीय व्यक्तिमत्व लोकसभेत निवडून आल्यास खर्या अर्थाने विकासात्मक बदल घडणार आहे. मावळ्यांनी आपल्या जीवाभावाच्या राजांसाठी स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याचप्रमाणे आपल्या जीवाभावाच्या माणसासाठी राष्ट्रवादीच्या मागे सर्वसामान्य जनता या निवडणुकीत उभी राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरोड्याच्या तयारीतील टोळी अटक


नगर । प्रतिनिधी - श्रीरामपूरवरुन नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी चार मोटारसायकलींवरुन येत असलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी देहरे टोलनाक्यावर सापळा लावून जेरबंद केले.
अल्तमश नासीर पठाण (वय 21, रा. श्रीरामपूर), अविनाश श्रीधर साळवे (वय 20, रा. राहुरी), सिराज उर्फ सोल्जर अयूब शेख (वय 23, रा. श्रीरामपूर), सागर गोरख मांजरे (वय 20, रा. श्रीरामपूर, हल्ली पाईपलाईन रोड, कोहिनूर मंगल कार्यालयामागे, नगर), भाऊसाहेब मधूकर गोरे (वय 26, रा. श्रीरामपूर), शाहरुख निसार पिंजारी (वय 22, रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन मोटारसायकलींवर पाठीमागे अरीफ गफूर शेख, अमोल नारायण होडगर (दोघे रा. पिंपरी अवघड, ता. राहुरी) हे बसलेले होते. पोलिसांना पाहताच ते अंधाराचा फायदा घेऊन दुचाकींवरुन उड्या मारुन पळून बाजूच्या शेतात पळून गेले. आरोपींकडून एक लोखंडी सुरा, कटावणी, सत्तूर, दोन लाकडी दांडके व नायलॉन दोरी, 5 मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण 1 लाख 65 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी यातील एक दुचाकी भिंगारमधून तर एक श्रीरामपूरमधून चोरुन आणल्याची कबुली दिली. तर एक विवो कंपनीचा मोबाईल सर्जेपुरा येथून चोरी केल्याची सिराज शेख याने कबुली दिली. अल्तमश पठाण याच्यावर तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांत प्रत्येकी एक, सागर मांजरे याच्या विरोधात तोफखाना पोलिसात चार, सिराज शेख याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात 5, अविनाश साळवे याच्यावर राहुरी पोलिसांत 4, भाऊसाहेब गोरे याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसमध्ये दोन, शाहरुख पिंजारीच्या विरोधात श्रीरामपूर शहर व राहुरी पोलिसांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. ते कोठे दरोडा टाकणार होते, याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही. या सर्वांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सुवेंद्र गांधींची बंडखोरी? नगरला तिरंगी लढत


नगर । प्रतिनिधी- नगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होऊन भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी समर्थकांच्या रविवारी (दि.24) रोजी नगर शहरात होणार्‍या मेळाव्यात खासदार दिलीप गांधी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ.सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर गांधी समर्थकांनी खा. गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी खासदार गांधी यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. खा. गांधी यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले असले तरी गांधी व कार्यकर्ते कितपत शांत राहणार हा संशोधनाचा विषय आहे.
दिलीप गांधी हे मोठ्या
विखेंची री ओढणार?
डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे वडील काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय यांचा भाजप प्रवेश हा त्यांचा निर्णय आहे.आपण काँग्रेसचे पाईक आहोत व काँग्रेसचेच काम करणार असल्याचे सांगितले. सध्या ते फक्त नगर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना नेमके काय सांगतात हे गुलदस्त्यात आहे, असो.
रविवारच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार दिलीप गांधी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता गांधी गटाच्या निर्णयाकडे विशेषत: विखे गटाचे लक्ष लागले आहे.
रविवारच्या मेळाव्यामध्ये सुवेंद्र गांधी यांचे नाव पुढे येण्याची चिन्हे आहेत. सुवेंद्र गांधी बंडखोर उमेदवार झाले तर खासदार दिलीप गांधी हे सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याप्रमाणे सुवेंद्रच्या बंडखोरीचा निर्णय सुवेंद्रचा आहे. आपण स्वत: पक्षाचे पाईक आहोत हा बहाणा ठेवतील असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Friday, 22 March 2019

बडीसाजन ओसवाल श्रीसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत


नगर । प्रतिनिधी - बडीसाजन ओसवाल श्रीसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात  पार पडली. अरणगाव रस्त्यावर प्रगतिपथावर असलेल्या समाजाच्या नूतन वास्तूमध्ये ही सभा झाली. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना, तसेच समाजातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सेक्रेटरी विशाल शेटिया यांनी सर्वांचे स्वागत केले व मागील वर्षभराचा वृत्तांत समाजासमोर मांडला. त्यास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. मागील वर्षी समाजाने केलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सभेसाठी उपाध्यक्ष रतीलाल कटारीया, सेक्रेटरी विशाल शेटिया, दीपक बोथरा, मिलिंद जांगडा, तसेच कार्यकारिणी सदस्य राजेंद्र बोथरा, धरमचंद कोठारी, सुंदरलाल भंडारी, महेंद्र लोढा, अजित कर्नावट, अनिल लुंकड, नरेंद्र चोरडिया, दिनेश शिंगवी, सुर्यकांत धोका, सुमतीलाल कोठारी, सल्लागार सदस्य अनिल कोठारी, धनराज खाबिया, मोहन बरमेचा, रमेश बाफना, शिरीष बोरा, शांतीलाल संकलेचा उपस्थित होते. या सर्वांनी समाजाच्या पुढील विविध कार्यांसाठी उपयुक्त अशा सूचना केल्या.
 अध्यक्ष विलास लोढा यांनी सुरुवातीला अरणगांव रस्त्यावरील श्री बडीसाजन श्रीसंघाच्या सुरु असलेल्या नूतन वास्तूत सभा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. समाजातील अनेक दानशूर योगदात्यांच्या योगदानातूनच अतिशय अद्यायावत, भव्य, सुंदर अशा वास्तूची निर्मिती होत असून तेथे 70 खोल्या असतील, उपयुक्त असे मंगल कार्यालय व मागील बाजूस लॉनचे काम सुरु असून एका वर्षांत ही वास्तू लोकार्पण करण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. संपूर्ण भारतात समाजाचे असे मंगल कार्यालय नसेल याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचेही लोढा म्हणाले. सभासदांच्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
श्री. लोढा पुढे म्हणाले की, माझी प्रकृती बरी नसते. परंतु समाजाच्या उत्कर्षाच्या कामात माझे मन रमते व त्यामुळे असलेल्या दुखण्याचा देखील विसर पडतो. या पुढचे संपूर्ण आयुष्य मी समाज्याच्या प्रगतीसाठी देणार असून त्यासाठी समाजाने दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 
ही नूतन वास्तू आर्किटेक्ट श्री. मयुर कोठारी व एस.एस. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर आहे. आपला समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. यापुढे आपल्याला समाजातील उपेक्षित व गरजूंसाठी घरकुल उभारण्याची सर्व संचालक मंडळाची योजना असून उद्योजक श्री. पेमराज बोथरा, धनराज संचेती व लालजी ट्रस्ट यांचे यासाठी मोठे सहकार्य लाभत आहे असे सांगून सर्वांचे आभार मानले.
या सभेमध्ये सर्वश्री. संजय छाजेड, राजेश कोठारी, संजय गुगळे, सीए किरण भंडारी, प्रकाश जैन, वसंत लोढा, मिलींद जांगडा, पेमराज बोथरा, सुभाष कर्नावट यांनी सूचना मांडल्या. श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे आनंद हॉस्पिटलजवळील मंगल कार्यालय देखील अद्ययावत करण्यात आले आहे, अशी माहिती विशाल शेटिया यांनी दिली. उपाध्यक्ष सूर्यकांत धोका यांनी आभार मानले.

अनिता खांदवे यांना समाजभूषण पुरस्कार


नगर । प्रतिनिधी - महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबिज केले आहे. आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवून नावलौकिक मिळवला आहे. कलागुण हे महिलांमध्ये उपजतच असतात. त्या कलेतून शास्त्रीय दृष्टीकोन जोपासून करिअर घडवावे, असे प्रतिपादन अनिता खांदवे यांनी केले.
केडगाव येथील रहिवासी असणार्‍या अनिता खांदवे यांना त्यांनी केलेल्या कलाविष्काराची दखल घेत पुणे येथील गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. या समारंभावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार  उल्हास पवार, डॉ. विठ्ठलराव जाधव, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, खा. रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब जाधव, उद्योजक दिलीप माने आदी उपस्थित होते. 
यावेळी आदर्श माता पुरस्काराने पाच, समाजभूषण पुरस्काराने सात, जिजाऊरत्न पुरस्काराने सहा महिलांचा गौरव करण्यात आला. खांदवे यांनी रांगोळीच्या माध्यमातून अनेक कलाविष्कार केले आहेत. संभाजी महाराजांचा जीवनपट रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी उलगडून दाखवला होता. यातील त्यांचे योगदान पाहूनच त्यांना हा सन्मान देण्यात आला.विविध स्पर्धांमधून त्यांनी 40 हून अधिक उत्कृष्ट रांगोळी रेखाटन केले आहे.

स्वत:च्या आयुष्याचे मालक नाही, विश्वस्त व्हा : संजय उपाध्ये


नगर । प्रतिनिधी - माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत सतत तुलना सुरू असते. या तुलनात्मक स्पर्धेत आनंदाने जगण्यासाठी अहंकार नष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:च्या आयुष्याचे मालन न बनता विश्वस्त व्हा, असा मोलाचा सल्ला प्रवचनकार संजय उपाध्ये यांनी दिला.
आचार्य आनंदऋषीजी महाराज महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीनिमित्त जैन सोशल फेडरेशनने आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या व्याख्यानमालेत उपाध्ये यांनी ‘तुलना करा आणि सुखात जगा’ या विषयावर पहिले पुष्प गुुंफले.
संजय उपाध्ये म्हणाले की, स्वकेंद्रित तुलना ही फायदेशीर असते तर आत्मकेंद्रित तुलना घातक ठरते. तुलना नकारात्मक असेल तरी तिचा सकारात्मक उपयोग करून घेता आला पाहिजे. उणीवेचाही उपयोग करून घेता येतो का हे महत्त्वाचे आहे. तुलना नावाच्या रोगाचे गुणात रुपांतर करायचे असेल तर त्यासाठी अहंकार नाहिसा होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वत:कडे तटस्थपणे बघता आले पाहिजे. परमेश्वराने मला विश्वस्त म्हणून या भूमीवर पाठवले आहे, या भावनेने आयुष्य जगा. म्हणजे तुम्ही स्वत:च्या आयुष्याचे मालक नव्हे विश्वस्त बनाल. आयुष्यात जसे यश मिळत जाते तसा तुलनेचा ओघ वाढत जातो. रिक्तावस्था नव्हे तर विरक्तावस्था हे मनुष्याच्या आयुष्याचे प्रयोजन आहे. माझ्यातील षडरिपूंचा मला पाहिजे तेव्हा उपयोग करता आला पाहिजे याला विरक्तावस्था म्हणतात. दैनंदिन आयुष्यात मनन, नमन आणि वमन करा. यामुळे प्रकृती उत्तम राहते.
गरजा कमी करत नेल्या की तुलनेचे स्वरुपही कमी होते. इतरांशी तुलना करण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. सुखाने जगण्यासाठी अधोमुखी तुलना करा. दैनंदिन जीवनात एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलता यायला हवा. तुलना करीत आयुष्यात त्रस्त न होता विश्वस्ताच्या भूमिकेतून सारे काही सांभाळायचे आहे ही भावना म्हणजे अध्यात्म आहे. आनंदाचे जगणे हा आयुष्याचा अंतिम हेतू साध्य होण्यासाठी ही भावना महत्त्वाची ठरते.
प्रास्ताविक प्रसाद बेडेकर यांनी केले. उपाध्ये यांचा सत्कार शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या अध्यक्ष आशाताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. संतोष गांधी यांनी आभार मानले. या व्याख्यानाप्रसंगी फौंडेशनच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया, डॉ.शरद कोलते, सौ.वैशाली कोलते, हेमराज बोरा आदी उपस्थित होते. आनंदधाम येथे आयोजित या व्याख्यानमालेत दि.22 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रशांत देशमुख यांचे ‘चला जीवन समृध्द बनवूया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

अखेर विखेंच्या नावावर भाजपकडून ‘शिक्कामोर्तब’


नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीकडून नगर  दक्षिणच्या जागेवर लोकसभा  मतदारसंघासाठी एकदम  नवा  चेहरा देण्याचा विचार सुरू  होता आणि त्यातच सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन जवळपास आपली उमदेवारी निश्चित केली होती. काल गुरुवारी सायंकाळी सुजय विखे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून नगर दक्षिणच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे संग्राम जगातप यांच्या विरुध्द भाजपाचे सुजय विखे अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने विखे यांच्या नावाची अधिकृत  घोषणा  केल्यानंतर विखे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  जिल्हाभरात विविध ठिकाणी फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचे  स्वागत करण्यात आले.
नगर जिल्ह्याला  धक्काशैलीचे राजकारण नवीन नसल्याने शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजेच उमेदवारी जाहीर होईपर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना होती. त्यातच विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी देऊ नये यासाठी  भाजपातील  एक गट सक्रिय झाला होता. सक्रिय झालेला हा गट आता विखे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने एक प्रकारे जिंकला आहे. मात्र, आता त्यांच्यापुढे निवडणुकीचे आव्हान उभे ठाकले असून भविष्यात गांधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिलीप गांधी यांनी जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी पक्षातील उमेदवाराला मदत केली तर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील असाही प्रश्न आता जिल्ह्यात चर्चिला जात आहे.
उमेदवारीसाठी गांधी यांनी पहिल्या टप्प्यात पक्षश्रेष्ठींची भेट घेवून दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही असे आता म्हणता येईल. नगर दक्षिणसाठी प्रदेशपातळीवरूनच गेल्या वर्षभरापासून चाचपणी सुरू होती. त्यात गांधींना पक्षामधूनच विरोध होता, तो काही ठिकाणी छुपा तर काही ठिकाणी उघड अशी अवस्था होती. ती पक्षश्रेष्ठीनी समोर ठेवूनच नवीन चेहर्‍यासाठी तयारी केली होती. सुजय विखे यांच्या रुपाने त्यांना नवीन चेहरा मिळाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या मतदारसंघावर भाजपाने आतापर्यंत दोन ते तीन वेळेस बाजी मारली आहे. सन 2014 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भाजपाकडे आला होता. आता तो कायम रहावा यासाठी पूर्ण  ताकदीने सुजय विखे प्रयत्न करतील.
नगर दक्षिणच्या या मतदारसंघात भाजपाची ताकद मोठी आहे. भाजपाचे तीन आमदार नगर दक्षिणमध्ये असल्याने भाजपला कितपत यश मिळणार हे देखील समोर येणार आहे. उमेदवार देऊन मतदारसंघ कायम ठेवायचा या विचारातूनच पक्षाबाहेरच्या पण प्रभावी असणार्‍या उमेदवाराबाबत विचार करण्यात आला असल्याने आता विखे यांना भाजपाचे किती नेते आणि किती कार्यकर्ते स्वीकारणार हा देखील प्रश्न आहे.  विखे यांच्या बरोबर जुने जाणते भाजपाचे ज्येष्ठ  पालकमंत्री राम शिंदे, प्रा.भानुदास बेरड, अ‍ॅड.अभय आगरकर,अ‍ॅड.अच्युतराव पिंगळे हे असल्याने त्यांना येणार्‍या अडचणीवर सहज मात करता येईल, अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

‘सण-उत्सवाच्या काळात समाजहिताचे उपक्रम राबवावे’


नगर । प्रतिनिधी - बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्य विविध व्याधींनी त्रस्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिनीत आजार, विहाराबरोबरच नियमित व्यायाम केला पाहिजे. तेव्हाच आपले आरोग्य निरोगी राहू शकते. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करुन घेतली पाहिजे. सण-उत्सव काळात यंग पार्टी, मंडळे, प्रतिष्ठानने असे समाज हिताचे उपक्रम राबविले पाहिजे, त्यातून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख हाफिज मोहंमद उमर यांनी केले. 
हजरत अली (रजि.) यांच्या जयंतीनिमित्त तख्ती दरवाजा यंग पार्टी, या अली यंग पार्टी, आरोग्य मित्र संघटना व के.के.आय. बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे तख्ती दरवाजा मशीद चौकात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुफी मुन्नवरशाह कादरी, मौलाना हाफिज जुबेर, राजूभाई शेख, शेख हाफिज मोहंमद उमर, मुश्ताक सर, मोहंमद हुसेन, डॉ.जुनेद शेख, शफाकत सय्यद, अमीर सय्यद, जावेद तांबोळी, शेख इसहाक, आबीद हुसेन, शेख कासीम, इम्रान खान, मतिन सय्यद, साजिद सय्यद, फैरोज खान, जावेद मास्टर आदी उपस्थित होते.
 सूत्रसंचालन मुश्ताक सर यांनी केले. आभार मोहंमद हुसेन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तख्ती दरवाजा यंग पार्टी व या अली यंग पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिरात तन्वीर चष्मावाला, डॉ.माया आल्हाट, डॉ.संभाजी भोर, डॉ.संजय शिंदे, डॉ.सतीश परमार आदींनी  122 रुग्णांची तपासणी केली. यातील 15 रुग्णांना पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.

खा. दिलीप गांधींचा रविवारी शहरात कार्यकर्ता मेळावा


नगर । प्रतिनिधी - तीन वेळा खासदार होऊनही भाजपने उमेदवारी डावलल्याने खा. दिलीप गांधी यांनी निवडणुकीतील पुढील भूमिका ठरविण्यासाठी रविवारी (दि. 24) दुपारी 1 वा. नगर शहरातील टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे मतदार संघातील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांना निरोप पाठविण्यात आले आहेत. 
पुन्हा नगर दक्षिण मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून खा. दिलीप गांधी गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा गांधी यांना होती. त्याचप्रमाणे गांधी यांच्या कार्यकर्त्यांनीही आशा सोडलेली नव्हती. मात्र भाजपने काल (गुरुवार) सायंकाळी उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन नुकतेच भाजपमध्ये आलेले डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गांधी समर्थक नाराज झाले आहेत. गांधी समर्थकांनी काल रात्री उशिरापर्यंत खा. गांधी यांच्या बंगल्यासमोर गर्दी केली होती. यावेळी खा. गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन निवडणुकीतील पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. 24) दुपारी एक वा. टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत कार्यकर्त्यांना निरोप पाठविण्यात आले आहेत.

शिवजयंती मिरवणूक काढणारच : गेंट्याल


नगर । प्रतिनिधी - तिथीनुसार नगर शहरात उद्या (शनिवार) होत असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या सुमारे 28 पदाधिकार्‍यांना 22 ते 24 मार्चदरम्यान शहरबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आम्हाला तडीपार करा, नाहीतर तुरुंगात टाका, शनिवारी शिवजयंती मिरवणूक काढणारच’, असा ठाम निर्धार हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख दिगंबर गेंट्याल यांनी व्यक्त केला आहे. 
पोलिसांनी केलेल्या शहरबंदीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गेंट्याल यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे.पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व प्रभू श्रीराम यांची जयंती (श्रीरामनवमी) हे दोन्ही उत्सव आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो. या महोत्सवांकरिता बंदोबस्त मागितला असता हे सरकार देत नाही. शिवाय मिरवणुकीला परवानगी नाकारली जाते. परवानगी नसल्याचे पत्र महोत्सवाच्या दिवशी 2-3 तासाअगोदर तोंडी नाकारले जाते. त्यामुळे न्यायालयातही दाद मागता येत नाही. आम्ही छत्रपती शिवराय व प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत. सरकारने परवानगी नाकारली तरीही आम्ही मिरवणुका काढू.
सरकारमध्ये बसलेले सत्ताधीश त्यांचे सरकार नसलेल्या राज्यात रामनवमी साजरी करण्याचा आग्रह करतात. मात्र, जिथे सत्ता आहे त्या महाराष्ट्रात रामनवमी मिरवणूक काढू देत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये रामनवमी साजरी करण्यासाठी ही मंडळी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. हा विरोधाभास अनाकलनीय आहे. गेली 5 वर्षे सरकारने परवानगी नाकारली. आम्ही महोत्सव साजरे करायचे, मग सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. 3-4 गुन्हे दाखल झाले की आम्हाला दरोडेखोरांची वागणूक देऊन तुरुंगात तरी धाडायचे नाही तर तडीपार तरी करायचे, असा पायंडा या सरकारने आणि परिहार्यतेने सरकारी यंत्रणेने पाडला आहे. तसेच आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे. त्यामुळे विद्यमान सरकार खरोखरीच हिंदूहिताचे आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो. आम्हाला तडीपार करा नाही तर तुरुंगात टाका, शिवजयंती आणि रामनवमी मिरवणूक काढणारच, असा निर्धार गेंट्याल यांनी व्यक्त केला आहे.

Thursday, 21 March 2019

आ. संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी


नगर । प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप यांना काल (बुधवार) उमेदवारी जाहीर केली. आ. जगताप यांची उमेदवारी जाहीर करुन राष्ट्रवादीने नगरच्या जागेचा पेच मिटविला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली तरी खा. दिलीप गांधी यांनीही आशा सोडलेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपची उमेदवारी विखेंना मिळणार की खा. गांधींना, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, आ. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीचे नगर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. सर्जेपुरातील रामवाडी परिसरातील नागरिकांनी तुतारीच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत केले. राष्ट्रवादीनेे अगोदर आ. अरुण जगताप यांना पसंती दिली होती. मात्र, भाजपकडून सुजय विखे यांचे नाव पुढे आल्याने राष्ट्रवादीनेही तरुण आणि तुल्यबळ उमेदवार देण्याचा विचार सुरू केला. त्यानुसार अखेर आ. संग्राम जगताप यांची उमेदवारी काल (बुधवार) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. आ. संग्राम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ मिटला आहे. आता आ. संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे यांच्यात सरळ लढत होईल, अशी चर्चा आहे. मात्र भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. एक-दोन दिवसात भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात नगर दक्षिणची उमेदवारी जाहीर झाल्यास चित्र स्पष्ट होईल. सुजय विखे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे सुजय विखे निर्धास्त झाले होते. मात्र खा. दिलीप गांधी यांनीही आशा न सोडता पुन्हा उमेदवारी खेचून आणण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे. तसेच खा. गांधी यांच्या समर्थकांनीही मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याने सुजय विखे यांच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे. सुजय विखे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपमधील गांधी विरोधकांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र दिल्लीतून कोणाला उमेदवारी जाहीर होते, याकडे मतदारसंघाचे लक्ष्य लागले आहे.

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून मानवसेवेचे कार्य ः सविताताई फिरोदिया


नगर । प्रतिनिधी -
आनंदऋषीजी हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर आहे. ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर भाविकाच्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होतात, त्याप्रमाणे या ठिकाणी येणारा प्रत्येक रुग्ण हा बराच होतो, असे प्रतिपादन साामाजिक कार्यकर्त्या सविताताई रमेश फिरोदिया यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅकण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त  रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट व सौ.सविताताई रमेशजी फिरोदिया आयोजित प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सौ.सविताताई व रमेश फिरोदिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा, संचालक अशोक कानडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, किशोर संघवी (जळगांव), शिबिरातील तज्ज्ञ डॉ.नरेंद्र मरकड, डॉ.सौ.माया मरकड, संतोष बोथरा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ.मनोहर पाटील, प्रकाश छल्लानी, कुंदन कांकरिया आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुभाष गुंंदेचा म्हणाले, पुणे, मुंबईसारखी रुग्णसेवा येथे मिळत आहे. तज्ज्ञ डॉक्टर अल्पदरात ही सेवा देत आहेत. खर्‍या अर्थाने आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे.
शिवाजी शिर्के म्हणाले, साामजिक बांधिलकीच्या माध्यमातून अत्याधुनिक मशिनरी व तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कमी दरात रुग्णसेवा हे हॉस्पिटल देत आहे. याचे इतरांनीही अनुकरण करावे, जेणेकरुन जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णसेवा मिळेल.
अशोक कानडे म्हणाले, प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. त्यामुळे गरिबांना उपचार घेणे अवघड जात आहे. अशा मोफत शिबिराच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलने सातत्याने हे महान कार्य सुरु ठेवले आहे.
संतोष बोथरा म्हणाले, दि. 28 मार्चला हॉस्पिटलच्या चौथ्या व पाचव्या मजल्याचे उद्घाटन होत असून, या ठिकाणी 18 बेडचे हायटेक आयसीयू, स्पेशल रुम, जनरल वॉर्ड व डायलेसिससाठी विशेष विभाग केला आहे.
 डॉ. नरेंद्र मरकड म्हणाले, जन्मजात व्यंग, मधुमेहामुळे होणार्‍या जुन्या जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्‍यावरील व्रण आदींवर प्लॅस्टिक सर्जरी करता येते. यामुळे रुग्णातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. हॉस्पिटलच्या माध्यमातून कमी दरात हे उपचार होत असल्याने सर्वसामान्यांना परडत आहेत.
या शिबिरात डॉ.नरेंद्र मरकड, डॉ.सौ.माया मरकड आदींनी रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.
दरम्यान, शुक्रवार दि.22 मार्च रोजी कान, नाक, घसा शिबिर होणार असून, यामध्ये डॉ. सुकेशिनी गाडेकर रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात दरवर्षी चिमण्यांच्या सरासरी संख्येत सुमारे 3 ते 5 टक्क्यांनी घट


नगर । प्रतिनिधी -
पशु, पक्षी,  झाडे, किटक व मानव हे सर्व जैवपर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. हे सर्व अन्नसाखळीद्वारे एकमेकांशी जोडले गेल्यामुळे एकाच्या संख्येवर झालेला परिणाम हा दुसर्‍यांवर निश्चितच प्रभाव टाकणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने जिल्हास्तरीय पक्षीगणनेचे आयोजन केले जात असून याद्वारे प्राप्त अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी चिमण्यांच्या सरासरी संख्येत सुमारे 3 ते 5 टक्क्यांनी घट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
चिमणी व तत्सम पक्षी हे मुख्यत: शेती पिकांवरील किडे-अळ्या खाऊन जगतात, पिल्लांना भरवण्यासाठी त्यांच्या वाढीसाठी प्रथिनयुक्त किड्यांची गरज वाढल्याने याकाळात तर त्यांच्या निरीक्षणशक्तीत प्रचंड प्रमाणात वाढ होते. यावेळी शेतीपिके अक्षरक्ष: पिंजून काढून ते नकळत या किडीच्या प्रादूर्भावापासून पिकांचे रक्षण करून नैसर्गिक किटकनाशकाचे कार्य करतात.
चिमण्यांच्या दिवसेंदिवस घटत जाणार्‍या प्रमाणामुळे शेतीपिकांवरील किडीच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ होत आहे. परिणामी शेतकर्‍यालाही किटकनाशकांचा जास्त वापर करावा लागत आहे. ज्याचे दुष्परिणाम कॅन्सरसारख्या विविध आजारांद्वारे मानवालाच भोगावे लागत आहेत. ही बाब संशोधनाद्वारेही आता सिद्ध होऊ लागली आहे. चिमणी हा मनुष्यवस्तीमध्ये मानवासोबत राहणारा व जगू शकणारा पक्षी आहे. त्यामुळे त्यांच्या घटत्या संख्येलाही सर्वस्वी मानवच जबाबदार असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीसुद्धा मानवावरच येऊन ठेपली आहे.
त्यांच्या संख्येत घट होण्याची मुख्य कारणे म्हणजे आधुनिकीकरण, वळचणींची ठिकाणे नसलेले घरे, अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष्य व मोबाईल टॉवरचे तरंग आदी आहेत.
अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना ही गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असून त्याद्वारे निसर्गातील जैवविविधतेचा शोध व त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी विविध जिल्हाव्यापी उपक्रम हाती घेतले जात आहेत. या उपक्रमांमध्ये दरवर्षी अनेक स्वयंसेवी संघटनाही आपले योगदान देत असून आवश्यक त्याठिकाणी वनविभागाचीही मदत घेतली जात आहे.
यावर्षी जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य स्थिती व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पशुपक्ष्यांचे व विशेषत: चिमण्यांचेही संरक्षण व संवर्धन होण्याच्या हेतूने एक मूठ धान्य-एक ओंजळ पाणी व एक रुपया पशुपक्ष्यांसाठी हे जिल्हाव्यापी अभियान निसर्गप्रेमींनी सुरू केले असून जिल्हाभरातील शेकडो शाळा, स्वयंसेवी संघटना व ग्रामस्थ यात सहभागी होत आहेत. या अभियानाद्वारे धान्य संकलन करून पशुपक्ष्यांसाठी आपल्या घर व शाळा परिसरात अन्नपाण्याची सोय केली जात आहे. याबरोबरच शाळांतून जमा होणार्‍या वर्गणीतून वनविभागातील व नैसर्गिक पाणवठे भरण्याचे व ठिकठिकाणी पाणवठे बनवण्याचे नियोजन केले जात आहे.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात चिमण्या व तत्सम पक्षांना मानवी वसाहतीमध्येच राहण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी या हेतूने कृत्रिम घरटी तयार करून ते सर्वत्र बसविण्याचे नियोजन केले जात आहे. या सर्व उपक्रमांवर सातत्याने कार्य झाल्यास निश्चितच जिल्हाभरात पुन्हा एकदा चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागेल असा निसर्गप्रेमींना विश्वास आहे.
निसर्गप्रेमींच्या या उपक्रमात जिल्हाभरातून शेकडो शाळा व स्वयंसेवी संघटना सहभागी होत असल्या तरी प्रत्येकाने या कार्यात आपला सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निसर्ग अभ्यासक जयराम श्रीरंग सातपुते (मो. 9604074796) यांनी केले आहे.

नगरमधील भक्तीचा जागर संपूर्ण राज्यात पोहचावा : नरेंद्र फिरोदिया


नगर । प्रतिनिधी -
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 27 व्या स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशनतर्फे आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित खुल्या समूह भक्तीगीत स्पर्धेत मोठ्या गटात भक्ती मंडळ (शिरूर) व वर्धमान अभिनंदन ग्रुप यांनी संयुक्तपणे प्रथम तर छोट्या गटात कृष्णा बाल भजन मंडळ व उज्वलनगर ग्रुपने संयुक्त विजेतेपद पटकावले.  जुन्या बसस्थानकाजवळील उज्वल कॉम्प्लेक्स येथील उज्वलनगर जैन धर्मस्थानक परिसरात झालेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. 
यावेळी प्रमोद गांधी (पीटू), गौरव भंडारी, बालगायक चैतन्य देवढे, खुशबू जैन, जैन सोशल फेडरेशनचे सुरेश कटारिया, संतोष गांधी, सरोज कटारिया, तनुजा भंडारी, सीमा मुनोत, सपना कटारिया,  परीक्षक संजय हिंगणे यांच्यासह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य, ब्राम्ही युवती मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी पूज्य अर्चनाश्रीजी, पूज्य उदयप्रभाजी, पूज्य चंदनाजी, पूज्य विपुलदर्शनाजी, पूज्य दिव्य दर्शनाजी, पूज्य पावनदर्शनाजी, पूज्य सुरभीश्रीजी आदी साध्वीजी उपस्थित होत्या.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त 15 वर्षांपासून ही स्पर्धा होत आहे. आज समाजाला थोरामोठ्यांच्या विचारांची गरज आहे. आपल्या भक्तीसंगीतात सकारात्मक ऊर्जा देण्याची ताकद आहे. या ठिकाणी स्पर्धकांनी सादर केलेली गीते खरोखर तल्लीन करणारी होती. अतिशय मनस्वी आनंद या गीतांनी दिला. अशा स्पर्धेसाठी योगदान देता येणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. दरवर्षी स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येणार्‍या काळात भक्तीचा हा जागर राज्यस्तरीय करावा. आचार्यश्रींना स्वतःला भक्तीगीत-संगीताची आवड होती. त्यांच्या विचारांनुसारच स्पर्धा सातत्याने होत आहे.   
दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत लहान व मोठ्या गटात मिळून 64 संघांनी सहभाग नोंदवला. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच अतिशय सुंदर भक्तीगीते सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज कटारिया यांनी केले.  आभार संतोष गांधी यांनी मानले. स्पर्धेसाठी जैन सोशल फेडरेशनच्या सर्व महिला, पुरूष सदस्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजश्री इनामदार व संजय हिंगणे यांनी काम पाहिले.

भारतीय स्टेट बँकेतून आधुनिक व वेगवान सेवा ः महाप्रबंधक देवेंद्र कुमार


नगर । प्रतिनिधी -
संपूर्ण भारतात अग्रगण्य व मुख्य असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून आधुनिक व तत्पर सेवा सर्व ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीला वेग आला आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, मोठे कारखानदार यांच्यासाठीही योजना राबवत आहे. भविष्यात स्टेट बँकेतून याहून अधिक वेगवान सेवा मिळतील, असे प्रतिपादन मुंबई परिमंडल-3 चे महाप्रबंधक देवेंद्र कुमार यांनी केले. 
महाप्रबंधक देवेंद्र कुमार यांनी नगरच्या भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखा, एमआयडीसी येथील क्षेत्रिय व्यवसाय कार्यालय व सावेडी शाखेस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. एमआयडीसीमधील क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाखाधिकार्‍यांना महत्वाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद विभागाचे उपमहाप्रबंधक एस.बी.पल्ले, क्षेत्रिय प्रबंधक सुबेध चव्हाण आदींसह जिल्ह्यातील सर्व शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते. 
शाखा व्यवस्थापकांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी मार्च एण्डमुळे कामास गती देण्याच्या सूचना करण्याबरोबरच प्रलंबित कामे पूर्ण करणे, थकित कर्ज वसुली करुन एनपीए कमी करणे, शाखांमधील ठेवी वाढविणे, कर्जखाती वाढविणे आदींबाबत महत्वाच्या सूचना केल्या.

Tuesday, 19 March 2019

स्त्रीरोग व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी - आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार्‍या सर्वोत्तम सेवेमुळे सर्वसामान्यांबरोबरच संपन्न परिवाराचा शिबिरात वाढता सहभाग ही समाजाला अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांनी व्यक्त केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्रीआनंदऋषीजी म.सा. यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीनिमित्त महावीर फूड प्रोडक्टचे श्रीमान महावीर बडजाते व श्रीमान अशोक चुडीवाल यांच्या परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत  स्त्रीरोग व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महावीर बडजाते, अशोक चुडीवाल, किरण बोरा (वडगाव शेरी), ललित छाजेड (पुणे), विनोद छाजेड (वैजापूर), इंजी.श्रीकांत काकाणी, इंजी.संदीप काकाणी, अ‍ॅड. संतोष गुगळे, सचिन कटारिया, आर्कीटेक सौ. कविता जैन, डॉ.प्रकाश कांकरिया, निहारिका बडजाते, कुणाल बडजाते, डॉ. रवींद्र मुथा, डॉ.निलोफर धानोरकर, संतोष बोथरा, डॉ. आशिष भंडारी, बाबुशेठ लोढा, प्रकाश छल्लाणी, डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते.  
स्वागत करताना डॉ. कांकरिया म्हणाले की, उत्तम आरोग्य सेवा देणे याच उद्देशाने दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने नवनवीन योजना येथे राबविण्यात आल्या आहेत. सध्या नेत्रालय व हृदयरोग विभागाचा लाभ हजारो रुग्णांना झाला आहे. राज्यातील नव्हे तर देशातील रुग्णांना विश्वास व दिलासा देण्याचे कार्य सर्वांच्या सहकार्याने सतत सुरु आहे.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, आता नवीन दोन मजले सेवेसाठी उपलब्ध झाले असून त्याचा अधिक रुग्णांना फायदा होईल.देशात एकाच ठिकाणी सर्वात जास्त डायलेसीस सेवा या हॉस्पिटलमध्ये आता दिली जाईल. 
यावेळी वडगाव शेरीचे सामाजिक कार्यकर्ते किरण बोरा म्हणाले की, प्रत्येक भेटीत या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवेत नाविन्यता व आधुनिकता दिसून येते. पुण्याचेही रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या विश्वासाने येतात. या सेवेत सहभागाचा आनंद आम्हा सर्वांना नेहमीच प्राप्त होतो.
आर्कीटेक्ट कविता जैन यांनी मनोगत सांगितले की आदर्शऋषींचे आशीर्वाद व प्रेरणेमुळे हॉस्पिटलच्या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे. हॉस्पिटलच्या इंटेरीअरच्या कामातून मिळालेले समाधान लाखमोलाचे आहे. यापुढेही हे कार्य करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.   
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार  करण्यात आला. दि.21 मार्च रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. त्याचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन फेडरेशनतर्फे  करण्यात आले आहे.शिबिरात 266 महिलांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन दत्ता वारकड यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्स


नगर । प्रतिनिधी - येथील जैन सोशल फेडरेशन संचलित प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्सचे आयोजन केले असून यामध्ये सर्वसामान्य जनतेसोबतच गरोदर माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे 85% पेक्षा जास्त आजार हे मनोकायिक (सायकोसोमॅटिक) आहेत. म्हणजे कमजोर व अशक्त मनामुळे निर्माण झालेले आहेत. जर आपण मनालाच शक्तीशाली बनविले तर भविष्यात होणार्‍या आजारापासून आपली सुटका होईल.
 तसेच आजार झालाच असेल तर औषधोपचारासोबतच मेडिटेशन करणे आवश्यक आहे. मेडिटेशनमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमधील हिलींग पॉवर (रोग बरा होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा) वाढते व रूग्ण इतर रूग्णांपेक्षा लवकर व पूर्ण बरा होतो. हृदयरोग, कॅन्सरसारख्या गंभीर रोगावर झालेल्या संशोधनाद्वारे हे सिध्द झाले आहे.
 आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये  मेडिटेशनची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे केवळ आरोग्याच्या समस्येवरच नव्हे तर इतरही संकटांवर सहज मात करता येते असे हजारोंचे अनुभव आहेत. 
गरोदर माता, स्तनदा माता समवेत त्यांचे पती, सासुबाई, आई, नणंद, बहिण किंवा इतर नातेवाईकांनाही याचा लाभ घेता येईल. किंबहुना गरोदर माता/ स्तनदा माता समवेत कमीत  कमी एक नातेवाईक असणे आवश्यक आहे.
 सदर कोर्स 25 मार्च ते 30 मार्च या कालावधीत दुपारी 4 ते 5.30 या वेळेत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर (आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या बेसमेंटला, आनंदऋषीजी मार्ग, अहमदनगर येथे होईल.
 आई, बाळ व परिवार यांच्या निरोगी व सुखी  जीवनाची  गुरकिल्ली म्हणजेच राजयोगा मेडिटेशन जीवनपध्दती होय. यामुळे  जीवन सहज, सुंदर, निरोगी व आनंदी बनवण्यास मदत होणार आहे. नावनोंदणी संपर्क प्रिया दिदी 9850887838 श्री दत्तात्रय वारकड 9766494901. सदर कोर्स संपूर्णत: मोफत असून जास्तीत जास्त व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंचे यश


नगर । प्रतिनिधी - हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून अनेक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये घवघवीत यश संंपादन करीत आहेत. अजीम काझी, किरण चोरमले, ओंकार येवले, अश्कान काझी, अनुज भोसले या अ‍ॅकॅडमीच्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून नगरचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. खेळाडूंंनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो, असा विश्वास अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद यांनी व्यक्त केला.
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतील क्रिकेटपटूंनी विविध स्पर्धांत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा क्रिकेट कीट बॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद बोलत होते. यावेळी कार्तिक नायर, अमित बुरा, अमोल तांबे, नदीम सय्यद, सर्फराज बांगडीवाला उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीच्या वतीने गौरव करण्यात आलेल्या अजीम काझीने महाराष्ट्र संघाकडून मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्याने गुजरात विरुद्ध 32 चेंडूंत 39 धावा करून करी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. 10 सामन्यांमध्ये गोलंदाजी करीत 7 बळी घेतले.
किरण चोरमले याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्याने एक शतक व एकूण 240 धावा फटकावल्या. ओंकार येवले याने केंद्रीय विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ खेलकूद स्पर्धेत पश्चिम विभागाच्या मुंबई संघाकडून प्रतिनिधीत्व करीत चांगला खेळ केला. 
अश्कान काझी याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. अनुज भोसले याची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघाकडून निवड झाली होती. त्यानेही चमकदार कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री साईसच्चरित्र चक्रीपारायणास भाविकांचा प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी - शहरातील तोफखाना परिसरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग 8 व्या वर्षी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण आयोजित केले होते. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिला भाविक या पारायण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
तोफखाना येथील ठाकुर गल्लीतील विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गुजरात येथील गिरनार पर्वताच्या 240 पेक्षा जास्त पौर्णिमा यात्रा व 108 हून अधिक सोरटी सोमनाथची यात्रा करणारे व्यक्तिमत्व  प.पू.श्री. प्रमोद केणे काका यांचे दिव्यानुभव कथनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण (52 अध्याय), अवतरणिका ग्रंथ वाचन (53 वा अध्याय) झाल्यानंतर साईबाबांची महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
या सोहळ्यात उपमहापौर मालन ढोणे, अर्चना झिंजे, पूनम ढवण, अश्विनी बिज्जा यांनीही सहभाग घेतला होता. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साईसेवा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष गणेश झिंजे, उपाध्यक्ष राहुल बिज्जा, सचिव ऋषीकेश अष्टेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अमोल गुंड, अंकुश वझीरकर, अ‍ॅड. नितेश गुगळे, अमित सासवडकर, विशाल दगडे, उमेश मेरगु, मंगेश रोकडे, विक्रम पाठक, दत्तु कुलकर्णी, समीर पाठक, आशिष आचारी, अमित सद्रे, सुरेंद्र सोनवणे, शिवदिप शिंदे, प्रशांत गोसके, रवी वाघावकर, मयुर सोनेकर, राजेंद्र रामदिन, अमोल मेरगु, किशोर वडझीरकर यांच्यासह जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ, काळभैरवनाथ मित्रमंडळ, तोफखाना नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

नगरचा पारा 40 अंशापुढे


नगर । प्रतिनिधी - पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसांपासून 37 अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने शहरात उकाडा जाणवत आहे. पुढील आठवडाभर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात किंचित घट, तर किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीचा उकाडा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. सोमवारी नगर येथे राज्यातील उच्चांकी 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि नाशिक वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 36 ते 39 अंशांवर आहे. कोकण विभागातील मुंबईत 31.5, तर सांताक्रुझ येथे 34 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे तापमान अधिक आहे. मराठवाडयात औरंगाबाद येथे 36.6 अंश कमाल तापमान नोंदविले गेले. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे 38 अंश, अकोला, ब्रह्मपुरी, वाशिम आदी भागात कमाल तापमान 37 अंशांपुढे नोंदविले गेले आहे.

विधानसभेचं गणित लक्षात घेता संग्राम जगताप लोकसभेसाठी?


नगर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्तरावर नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत चाचपणी सुरु असल्याने नगर लोकसभा मतदार संघात नेमकी लढत कोणत्या दोन उमेदवारांमध्ये होईल याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुंबई येथील कार्यक्रमात त्यांच्या उमेदवारीची शिफारस भाजपा संसदीय बोर्डाकडे करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी डावलली जाईल असे बोलले जाते. परंतु आयात विखेंच्या उमेदवारीस खा. गांधी समर्थकांचा विरोध आहे. एकूणच आजमितीला भाजपा स्तरावर नेमके उमेदवार सुजय विखे पाटील की, विद्यमान खासदार दिलीप गांधी याचा उलगडा होणे बाकी आहे.
भाजपाचा उमेदवार अद्याप अंतिम नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर लोकसभेचे उमेदवार म्हणून आ.अरुण जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना-भाजपा यांच्यात झालेली युती ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कायम राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी आपली व्यूहरचना बदलली असून ते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्तरावर सध्या आ.अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप यापैकी कोणाला उमेदवारी द्यावयाची हा प्रश्न आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नगर लोकसभेसाठी आ.अरुण जगताप यांच्या नावाला पसंती आहे.
एका बाजूला एकूणच लोकसभा निवडणुकीपासून बाजूला राहण्याचे प्रयत्न करणारे आमदार संग्राम जगताप यांनी युतीचे समीकरण लक्षात घेऊन लोकसभेसाठी स्वत: इच्छुक असल्याचे पक्षस्तरावर कळविले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्तरावर जगताप कुटुंबात नेमके कोणाला उमेदवारी द्यावयाची या विषयीचा निर्णय होणार आहे.
आमदार कर्डिलेंची खेळी
नगर शहराच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय समीकरणे ही नेहमीच बेरजेची ठरली आहेत. सामाजिकदृष्ट्या त्यांची प्रतिमा काय आहे, यापेक्षा राजकीयदृष्ट्या ती नेहमीच मोठी राहिली व त्यांचे राजकीय निर्णयही फायद्याचेच राहिलेत. आगामी विधानसभा लक्षात घेऊन व निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युती लक्षात घेता त्यांच्या स्तरावरुन आ.संग्राम जगताप यांचा लोकसभेचा प्रस्ताव पुढे आल्याची चर्चा आहे.


नगर । प्रतिनिधी -
आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार्‍या सर्वोत्तम सेवेमुळे सर्वसामान्यांबरोबरच संपन्न परिवाराचा शिबिरात वाढता सहभाग ही समाजाला अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांनी व्यक्त केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्रीआनंदऋषीजी म.सा. यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीनिमित्त महावीर फूड प्रोडक्टचे श्रीमान महावीर बडजाते व श्रीमान अशोक चुडीवाल यांच्या परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत  स्त्रीरोग व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. सागर झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महावीर बडजाते, अशोक चुडीवाल, किरण बोरा (वडगाव शेरी), ललित छाजेड (पुणे), विनोद छाजेड (वैजापूर), इंजी.श्रीकांत काकाणी, इंजी.संदीप काकाणी, अ‍ॅड. संतोष गुगळे, सचिन कटारिया, आर्कीटेक सौ. कविता जैन, डॉ.प्रकाश कांकरिया, निहारिका बडजाते, कुणाल बडजाते, डॉ. रवींद्र मुथा, डॉ.निलोफर धानोरकर, संतोष बोथरा, डॉ. आशिष भंडारी, बाबुशेठ लोढा, प्रकाश छल्लाणी, डॉ. मनोहर पाटील उपस्थित होते.  
स्वागत करताना डॉ. कांकरिया म्हणाले की, उत्तम आरोग्य सेवा देणे याच उद्देशाने दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने नवनवीन योजना येथे राबविण्यात आल्या आहेत. सध्या नेत्रालय व हृदयरोग विभागाचा लाभ हजारो रुग्णांना झाला आहे. राज्यातील नव्हे तर देशातील रुग्णांना विश्वास व दिलासा देण्याचे कार्य सर्वांच्या सहकार्याने सतत सुरु आहे.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, आता नवीन दोन मजले सेवेसाठी उपलब्ध झाले असून त्याचा अधिक रुग्णांना फायदा होईल.देशात एकाच ठिकाणी सर्वात जास्त डायलेसीस सेवा या हॉस्पिटलमध्ये आता दिली जाईल. 
यावेळी वडगाव शेरीचे सामाजिक कार्यकर्ते किरण बोरा म्हणाले की, प्रत्येक भेटीत या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवेत नाविन्यता व आधुनिकता दिसून येते. पुण्याचेही रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या विश्वासाने येतात. या सेवेत सहभागाचा आनंद आम्हा सर्वांना नेहमीच प्राप्त होतो.
आर्कीटेक्ट कविता जैन यांनी मनोगत सांगितले की आदर्शऋषींचे आशीर्वाद व प्रेरणेमुळे हॉस्पिटलच्या कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे. हॉस्पिटलच्या इंटेरीअरच्या कामातून मिळालेले समाधान लाखमोलाचे आहे. यापुढेही हे कार्य करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.   
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार  करण्यात आला. दि.21 मार्च रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. त्याचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन फेडरेशनतर्फे  करण्यात आले आहे.शिबिरात 266 महिलांची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन दत्ता वारकड यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्स


नगर । प्रतिनिधी - 
येथील जैन सोशल फेडरेशन संचलित प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्सचे आयोजन केले असून यामध्ये सर्वसामान्य जनतेसोबतच गरोदर माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
 जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे 85% पेक्षा जास्त आजार हे मनोकायिक (सायकोसोमॅटिक) आहेत. म्हणजे कमजोर व अशक्त मनामुळे निर्माण झालेले आहेत. जर आपण मनालाच शक्तीशाली बनविले तर भविष्यात होणार्‍या आजारापासून आपली सुटका होईल.
 तसेच आजार झालाच असेल तर औषधोपचारासोबतच मेडिटेशन करणे आवश्यक आहे. मेडिटेशनमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमधील हिलींग पॉवर (रोग बरा होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा) वाढते व रूग्ण इतर रूग्णांपेक्षा लवकर व पूर्ण बरा होतो. हृदयरोग, कॅन्सरसारख्या गंभीर रोगावर झालेल्या संशोधनाद्वारे हे सिध्द झाले आहे.
 आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटरमध्ये  मेडिटेशनची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे केवळ आरोग्याच्या समस्येवरच नव्हे तर इतरही संकटांवर सहज मात करता येते असे हजारोंचे अनुभव आहेत. 
गरोदर माता, स्तनदा माता समवेत त्यांचे पती, सासुबाई, आई, नणंद, बहिण किंवा इतर नातेवाईकांनाही याचा लाभ घेता येईल. किंबहुना गरोदर माता/ स्तनदा माता समवेत कमीत  कमी एक नातेवाईक असणे आवश्यक आहे.
 सदर कोर्स 25 मार्च ते 30 मार्च या कालावधीत दुपारी 4 ते 5.30 या वेळेत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर (आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या बेसमेंटला, आनंदऋषीजी मार्ग, अहमदनगर येथे होईल.
 आई, बाळ व परिवार यांच्या निरोगी व सुखी  जीवनाची  गुरकिल्ली म्हणजेच राजयोगा मेडिटेशन जीवनपध्दती होय. यामुळे  जीवन सहज, सुंदर, निरोगी व आनंदी बनवण्यास मदत होणार आहे. नावनोंदणी संपर्क प्रिया दिदी 9850887838 श्री दत्तात्रय वारकड 9766494901. सदर कोर्स संपूर्णत: मोफत असून जास्तीत जास्त व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंचे यश


नगर । प्रतिनिधी -
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून अनेक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये घवघवीत यश संंपादन करीत आहेत. अजीम काझी, किरण चोरमले, ओंकार येवले, अश्कान काझी, अनुज भोसले या अ‍ॅकॅडमीच्या क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून नगरचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. खेळाडूंंनी अधिक मेहनत घेतल्यास त्यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो, असा विश्वास अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद यांनी व्यक्त केला.
हुंडेकरी स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतील क्रिकेटपटूंनी विविध स्पर्धांत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा क्रिकेट कीट बॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष वसीम सय्यद बोलत होते. यावेळी कार्तिक नायर, अमित बुरा, अमोल तांबे, नदीम सय्यद, सर्फराज बांगडीवाला उपस्थित होते. अ‍ॅकॅडमीच्या वतीने गौरव करण्यात आलेल्या अजीम काझीने महाराष्ट्र संघाकडून मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्याने गुजरात विरुद्ध 32 चेंडूंत 39 धावा करून करी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. 10 सामन्यांमध्ये गोलंदाजी करीत 7 बळी घेतले.
किरण चोरमले याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्याने एक शतक व एकूण 240 धावा फटकावल्या. ओंकार येवले याने केंद्रीय विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ खेलकूद स्पर्धेत पश्चिम विभागाच्या मुंबई संघाकडून प्रतिनिधीत्व करीत चांगला खेळ केला. 
अश्कान काझी याने 14 वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. अनुज भोसले याची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघाकडून निवड झाली होती. त्यानेही चमकदार कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री साईसच्चरित्र चक्रीपारायणास भाविकांचा प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
शहरातील तोफखाना परिसरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग 8 व्या वर्षी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण आयोजित केले होते. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिला भाविक या पारायण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
तोफखाना येथील ठाकुर गल्लीतील विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गुजरात येथील गिरनार पर्वताच्या 240 पेक्षा जास्त पौर्णिमा यात्रा व 108 हून अधिक सोरटी सोमनाथची यात्रा करणारे व्यक्तिमत्व  प.पू.श्री. प्रमोद केणे काका यांचे दिव्यानुभव कथनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण (52 अध्याय), अवतरणिका ग्रंथ वाचन (53 वा अध्याय) झाल्यानंतर साईबाबांची महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
या सोहळ्यात उपमहापौर मालन ढोणे, अर्चना झिंजे, पूनम ढवण, अश्विनी बिज्जा यांनीही सहभाग घेतला होता. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साईसेवा प्रतिष्ठानचे  अध्यक्ष गणेश झिंजे, उपाध्यक्ष राहुल बिज्जा, सचिव ऋषीकेश अष्टेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अमोल गुंड, अंकुश वझीरकर, अ‍ॅड. नितेश गुगळे, अमित सासवडकर, विशाल दगडे, उमेश मेरगु, मंगेश रोकडे, विक्रम पाठक, दत्तु कुलकर्णी, समीर पाठक, आशिष आचारी, अमित सद्रे, सुरेंद्र सोनवणे, शिवदिप शिंदे, प्रशांत गोसके, रवी वाघावकर, मयुर सोनेकर, राजेंद्र रामदिन, अमोल मेरगु, किशोर वडझीरकर यांच्यासह जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ, काळभैरवनाथ मित्रमंडळ, तोफखाना नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.