Monday, 28 January 2019

जीवनात भगवान बाबांच्या संदेशाचे आचरण करा : आ. संग्राम जगताप


नगर । प्रतिनिधी - देवाचे नामस्मरण केल्याने रोजच्या कामासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसभरात एकदातरी परमेश्वराचे नाव मुखात असावे. प्रत्येक कामाची  सुरुवात देवाच्या नामस्मरणाने  करावी, संत-महात्म्यांनी केलेल्या उपदेशामुळे अनेकांचे जीवन सुजलाम्-सुफलाम् झाले आहे. त्यामुळेच तरुण पिढीने आधुनिक युगात तंत्रज्ञानाबरोबर धार्मिक कार्यातही उत्साहाने भाग घेतला पाहिजे. संत भगवान बाबांनी सत्कर्माचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आपल्या जीवनात आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सारसनगर येथे संत भगवान बाबा यांच्या कीर्तन महोत्सवाच्या सांगताप्रसंगी काल्याची दहिहंडी ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.संग्राम जगताप बोलत होते. 
याप्रसंगी संदीप कर्डिले, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, संजय चोपडा, झुंबर आव्हाड, बबन घुले, अनिल पालवे, भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर खेडकर, विलास शिंदे, उद्योजक भिमराज फुंदे, बाबासाहेब जाधव, म्हतारदेव घुले, देवराम घुले, पाराजी ढाकणे, भगवान ढाकणे, रामदास बडे, मयुर विधाते आदी उपस्थित होते.
सप्ताहादरम्यान विविध किर्तनकारांनी आपली सेवा दिली. तसेच समारोपप्रसंगी भाविकांनी परिसरातून शोभायात्रा काढली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सप्ताह यशस्वीतेसाठी भगवान बाबा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, महिला भक्तमंडळाने परिश्रम घेतले. 
यावेळी बाबा गाडळकर, दत्ता जाधव, किसनराव घुले, दराडे, नीलेश बडे, नामदेव गिते, गणेश बडे, अमोल जाधव, सुधाकर चेमटे, भैरु सानप, उद्धव ढाकणे, दादा कर्‍हाड, मच्छिंद्र कराळे आदींसह महिला, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment