Tuesday, 29 January 2019

भाजयुमोच्या राज्यस्तरीय सी. एम. चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ


नगर । प्रतिनिधी - राज्यातील युवक-युवतींना हक्काचे मैदान व व्यासपीठ या सी. एम. चषक स्पर्धेमुळे मिळाले आहे. सामान्य खेळाडूही मोठा व्हावा, तसेच युवक पुन्हा मैदानाशी जोडला जावा, या उद्देशाने प्रदेश युवा मोर्चाच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी दिली.
राज्यस्तरीय सी. एम. चषक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या सी. एम. चषक अंतर्गत होणार्‍या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद नगरला मिळाले आहे. आज (मंगळवार) सकाळी वाडिया पार्क मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. योगेश टिळेकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. यावेळी आ. टिळेकर यांनी खेळपट्टीचे पूजन करुन चेंडू टोलावून स्पर्धेचे उद्घाटन केले.  याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, युवा मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किशोर वाकळे, कोषाध्यक्ष तुषार पोटे, जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, सुवेंद्र गांधी, राष्ट्रीय खेळाडू अंजली वल्लाकट्टी, नगरसेवक राहुल कांबळे, मनोज कोतकर, संजय ढोणे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील 32 जिल्ह्यांमधून युवक-युवतींचे संघ सहभागी झाले आहेत. युवकांचे सामने वाडिया पार्क मैदानावर तर युवती संघांचे सामने नगर कॉलेजच्या मैदानावर होणार आहेत.
आ. टिळेकर पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात सी. एम. चषक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्व जिल्ह्यात झालेल्या स्पर्धांमधून अंतिम विजेत झालेल्या संघांना येत्या 3 फेब्रुवारीला मुंबईत पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आ. पूनम महाजन यांच्याहस्ते व राज्यातील सुमारे 1 लाख युवकांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
खा. गांधी म्हणाले, तुमच्यातूनच एखादा महान खेळाडू निर्माण व्हावा, यासाठी या सी. एम. चषक स्पर्धा फलदायी ठरतील. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला एवढे मोठ्या स्पर्धाचे यजमानपद मिळाल्याने संपूर्ण राज्यातून युवक-युवती स्पर्धक येथे आले आहेत.
प्रास्ताविक शहराध्यक्ष नितीन शेलार यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. सुवेंद्र गांधी यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश साठे, अज्जू शेख, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश साखला, कैलास गर्जे यांनी परीश्रम घेतले. यावेळी मिलिंद भालसिंग, नाना भोरे, सागर गोरे, सुमित खरमाळे, अभिजित चिप्पा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment