नगर । प्रतिनिधी - सामाजिक जाण असलेला युवक समाजामध्ये निर्माण व्हावा, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजे. यासाठी नगर शहरामध्ये वूई सपोर्ट संग्रामभैय्या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील अस्वच्छ भिंती रंगवून त्या भिंतीवर सामाजिक सुविचार, संदेश व चित्रे रेखाटली जाणार आहेत. हे सर्व उपक्रम ग्रुपचे कार्यकर्ते दर रविवारी स्वखर्चातून व श्रमदानातून करणार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सारडा कॉलेजच्या भिंती रंगून वूई सपोर्ट संग्रामभैय्या ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम शहरात सुरु करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, सारंग पंधाडे, वैभव ढाकणे, साहेबान जहागिरदार, नीलेश बांगरे, शाहनार खान, लंकेश चितळकर, अजिंक्य नारळे, शुभम नेहे, प्रशांत धपले, दादा शिंदे, नीलेश साळवे, राकेश सायखेडकर, अभिजित म्हस्के, सोहेल सय्यद, सौरव पवार, प्रशांत बेल्हेकर, भाऊ पुंड, प्रथमेश औटी, सारडा कॉलेजचे अशोक असेरी आदी उपस्थित होते.
प्रा. विधाते म्हणाले, नगर शहरातील दर्शनी भागातील सुमारे 50 भिंतींचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. युवा पिढीच्या माध्यमातून नगर शहर सुंदर बनविण्याचा एक संकल्प वूई सपोर्ट संग्रामभैय्या ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.
याप्रसंगी सुरेश बनसोडे म्हणाले, शहरातील युवकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. गटनेते संपत बारस्कर म्हणाले, कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
No comments:
Post a Comment