Saturday, 10 August 2024

चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल - आ. संग्राम जगताप

 शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटीचा विकास आराखडा तयार केला. त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहे, याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार 44 कोटी रुपये मिळाले आहे, या माध्यमातून शहरांमधील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामाचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहे, माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडली जातील व चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जाते. गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नवीन रस्ता निर्माण केला. मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजी नगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याची प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
       आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेविका शोभा बोरकर, अशोक गायकवाड, निखिल वारे, अजिंक्य बोरकर , बाळासाहेब पवार, अमोल गाडे, संजय चोपडा, काकासाहेब शेळके, मनोज दुल्लम, उदय कराळे, करण कराळे, एडवोकेट येव्होन मकासरे, सतीश बारस्कर, डॉक्टर सतीश सोनवणे, डॉक्टर प्रशांत पठारे, रमेश खिलारी, सतीश गुंफेकर, संजय खामकर ,विजय मगर, भरत पवार, बबन काळे, विशाल शिंदे ,जयकुमार खूपचंदानी, बाळासाहेब गायकवाड, सुशील बजाज, जयराम काबरा, सनी अहुजा ,डॉक्टर वाळेकर, डॉक्टर भोईटे ,महादेव काकडे ,जितू खंडेलवाल, जितू गंभीर, सुशील थोरात, सुबा खंडेलवाल, अशोक गोपलानी, मयूर कुलथे, सुमित महाजन ,मुकुल गंधे ,योगेश सोनवणे, बाबासाहेब भोंगे, सुमित कुलकर्णी ,आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
        

Saturday, 22 June 2024

महापालिकेत जागतिक योग दिन साजरा

मनपाच्या वतीने जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार - अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी
देशामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज अहमदनगर महानगरपालिके तील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत योगाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले आहे. भविष्यकाळात नगर शहरातील जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. योग हा व्यायाम नसून एक जीवन पद्धत आहे. योगामुळे शरीर, मन, बुद्धी या सर्वांवर चांगला परिणाम होत असून आनंदीमय जेवण जगता येत असते. शासकीय कर्मचारी यांना काम करीत असताना ताण-तणाव निर्माण होत असतो. मात्र दैनंदिन योग साधनेच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी व सुदृढ राहत असते त्यामुळे आपण समाजामध्ये चांगले काम करू शकतो. असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले. 
   अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,प्रकाश लोखंडे, उपयुक्त विजयकुमार मुंडे, उपयुक्त श्रीकांत साताळकर, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे, इंजिनिअर गणेश गाडळकर, आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकश लोखंडे , डॉ. भावना पेंदम, बेलेश्वर पेंदम यांनीं योगा प्रशिक्षण दिले.

Saturday, 15 June 2024

विद्यालयांत नवगतांचे स्वागत उत्साहात


महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या अभिनव बालवाडी, सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. १५/०६/२०२४ रोजी विद्यालयात मोठ्या उत्साहान संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी भूषविले. कार्यकमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव बेलेकर, सदस्य मा. श्री. विलासराव सावळे मा. सौ. पुष्पाताई बोरुडे, अध्यक्षा, महिला व बालविकास समिती, अहमदनगर महानगरपालिका व मा. सौ. वंदनाताई ताठे, नगरसेविका, अहमदनगर महानगरपालिका हे उपस्थित होते. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयांतील विद्यार्थ्यांना गुणवान होण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू असे अश्वासन दिले. तसेच विद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करून गोरगरीब अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणारी शाळा असे सौ. पुष्पाताई बोरूडे यांनी आपल्या भाषणांत सागितले. तसेच सौ. वंदनाताई ताठे यांनी नविन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मुलीनी मोफत शिक्षणाचा फायदा घेवून उच्चशिक्षित व्हावे असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हेव विद्यालयाचे ध्येय असून विविध स्पर्धा परीक्षांतून विद्यालयाचा नावलौकीक वाढवावा असे संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंतराव बेलेकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले.
कार्यक्रमावेळी प्राथमिक विद्यालयाच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीम. काळे लतिका आप्पाजी, माध्यमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री. गायकवाड अनिल शंकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. संगिता बनकर व आभारप्रदर्शन सौ. जयश्री देशपांडे यांनी केले,

Sunday, 2 June 2024

*मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये ढोल ताशा व तुतारीच्या गजरात नवागतांचे स्वागत*

*बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी-जगदीश झालानी*                                             

मुलांनी शाळेत आल्यानंतर आनंदी वातावरणात शिक्षण घ्यावे.यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील शिक्षक प्रयत्न करीत असतात.मुलांना शाळेचा कंटाळा येऊ नये. यासाठी मुलांना विविध खेळ, संगीत,नृत्य,गोष्टींची पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी. असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत ढोल,ताशाच्या व तुतारीच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले.प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुग्यांची कमान करण्यात आली होती.शाळेतील शिक्षिका राजश्री बिडकर यांनी मिकी माऊसचा वेष परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले.दा चौधरी विद्यालय,पटवर्धन चौक येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून फुलांची उधळण केली.
याप्रसंगी मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी,प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, दीपक शिंदे,संतोष भंडारी,मनोज हिरणवाळे,सत्यश्री चिलका, मोहिनी नराल,आशा घोरपडे, राजश्री बिडकर,दळवी पूनम,सुनिता भोपाळे,आयमन बागवान आदी उपस्थित होते. प्रा.अनुरीता झगडे म्हणाले,मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे. यासाठी वर्षभर विविध उपक्रम सण,उत्सव साजरे केले जातात.तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे.यासाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर ही घेतले जाते.तसेच प्राणायाम विविध व्यायामाच्या प्रकारे शिकवले जातात.

Thursday, 9 May 2024

*जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा -शंकरजी गायकर*

विश्व हिंदू परिषदेचा हिंदू जनसंवाद मेळावा उत्साहात*                                                                                                  
   नगर-देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकाने आपले अनमोल मत द्यावे.पाच वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक व राष्ट्र पुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करूनच देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.खऱ्या अर्थाने या देशाला हिंदुत्वाची परिभाषा कोणी शिकवली असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. देशासाठी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेची महाआरती तसेच अनेक ग्रंथ लिहून विश्वामध्ये हिंदुत्वाचे नाव अजरामर केले आहे.ही शूर वीरांची भूमी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,गुरुगोविंद सिंग,चन्नम्मा,झाशीची राणी,नेता सुभाष बोस,अहिल्यादेवी होळकर,भगतसिंग या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अबकी बार 400 चा आकडा पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.आज देशात लव जिहाद,व्होट जिहाद, धर्मांतरण,गोहत्या नक्षलवाद,आतंकवाद अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.तसेच काही धर्मांधांकडून व्होट जिहाद करण्यासाठी पत्रक बाजी करण्यात येत आहे. तर काही पक्षांकडून सरकार आले तर प्रभू श्रीरामाचे मंदिर पुन्हा झोपडीत बांधू अशाप्रकारे हिंदू संस्कृतीला व धर्माला हिनतेची वागणूक देण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात घडत आहेत.जर कोणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वाईट भावना मनात ठेवून हात लावण्याचा जरी विचार केला तर समस्त हिंदू समाज,बजरंग दल,व विश्व हिंदू परिषद त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.आज देशात 400 चा आकडा पार झाल्यास एकच मंत्र देण्यात येईल जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा !असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे.                                 

  पटेल मंगल कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू जनसंवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र -गोवा मुंबई क्षेत्राचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड.जय भोसले,शहराध्यक्ष विजयकुमार पादिर,जिल्हा मंत्री अनिल जोशी,विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी,भरत थोरात आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले. स्वागत व परिचय गजेंद्र सोनवणे यांनी करून दिला.सूत्रसंचालन भरत थोरात यांनी केले. तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,मातृ शक्ती,बजरंग दल,रा.स्व.संघ,विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 6 May 2024

संत किसनगिरी नगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ

श्रीमद् भागवत निष्ठेने श्रवण केल्यास सकल दुःखाचा नाश होऊन परमानंदाची प्राप्ती -साध्वी अनुराधा दीदी. 


प्रातःस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व व भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या परिसरात श्रीमद् भागवत कथेचे दिव्यचिंतन करीत आहोत.हजारो जन्माच्या मिळविलेल्या पुण्याने श्रीमद् भागवत कथा ऐकण्याची बुद्धी प्राप्त होते.ऋषीमुनींनी जे समृद्ध भंडार ठेवले आहे.ते आपण कथेच्या माध्यमातून श्रवण करावे. जीवनात व प्राप्त झाले तर कायमच टिकतील असे नाही.परमात्मा भगवंत प्राप्त झाले तर ते कायमचे प्राप्त होतात. श्रीमद् भागवत निष्ठेने जे श्रवण करतात त्यांचे सकल दुःखांचा नाश होतो.आणि परमानंदाची प्राप्ती होते.भवरोगाचे रामबाण औषध भागवत आहे. सत्संग म्हणजे काय आहे? ज्या संगाने भोगाचे महत्त्व कमी होते.ज्या संगाने परमात्मा भगवंत प्राप्त होतो. त्याला सत्संग म्हणतात, नामस्मरण करण्याची प्रेरणा निर्माण होते त्याला सत्संग म्हणतात.श्रीमद् भागवत हे मनोरंजनाचे साधन नाही तर मनोभंजनाचे साधन आहे. मनोज कृष्णमय कसे करायचे आहे हे शिकवणारे भागवत आहे. भोगाच्या दिशेने चाललेली दिशा भगवंताच्या दिशेकडे वळविण्यासाठी श्रीमद् भागवत हे शास्त्र आहे.असे निरूपण भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी प.पू.अनुराधा दीदी यांनी पहिले पुष्प गुंफताना केले आहे.पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी संत किसनगिरी नगर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.श्रीमद् भागवत ग्रंथाचे पालखीत पूजन करून तसेच वारकरी भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.महिलांनी फुगडीचा फेर धरला,परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी यांची बगीतून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतून न ठेवता आनंददायी शिक्षण द्यावे.सततच्या अभ्यासाने मुलांवर अभ्यासाचा ताण येतो.मुलांना वेगवेगळ्या खेळण्यातून, कृतीतून शिक्षण द्यावे.उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.दादा चौधरी मराठी शाळेत चांगल्या प्रकारे धमाल छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुलांना भरपूर फायदा झाला आहे. या शिबिरात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते.तसेच डिसेंबर महिन्यातही अशा प्रकारे शिबिर घ्यावे.अशी मागणी विद्यार्थ्यांनी करावी.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्या प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत तीन वर्ष ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीला महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गिरी व विश्रामबाग शाळेच्या बालवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका वर्षा चिखले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,कार्यकारणी सदस्य प्रा.ज्योतीताई कुलकर्णी,दादा चौधरी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.नंदा कानिटकर,मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे ,दिलीप परसपाटकी आदि उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शिबिराच्या माध्यमातून अत्यंत चांगले शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचे मनोरंजन,खेळ,तसेच व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी प्रेरणादायी चित्रपट हंबीरराव मोहिते दाखविण्यात आला आहे. या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. धमाल छंद वर्गात अकरा दिवसात शिकवलेल्या उपक्रमापैकी नृत्य सादरीकरण दोन गटात करण्यात आले.अनुष्का चंगेडिया या विद्यार्थिनीने भरतनाट्यम नृत्य सादर केले. कु‌.आर्या उपरे, रचना कनोरे,सारंगा कुलकर्णी, गौरव बेद्रे,शेळके या विद्यार्थ्यांनी मनोगत सादर केली.प्रास्ताविक सुभाष येवले म्हणाले, शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.दर शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली वाळुंजकर यांनी केले.तर आभार दिलीप परसपाटकी यांनी मानले.या शिबिर यशस्वीतेसाठी शाळेतील मंगल पवार,गणगले मॅडम, वाकचौरे मॅडम,देवराव मॅडम, प्रिया अहिरे,रुचिता मॅडम,वैशाली डफळ आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Saturday, 20 April 2024

भगवान महाविरांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी महत्वाची आहे - खा. डॉ. सुजय विखे पाटील

 
भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार  खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार, धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन भगवान महाविरांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केले. 
यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, भगवान महावीर हे त्याग, करूणा आणि संवेदनशीलतेचे प्रतिक आहेत. त्यांची संयम, सदाचार, करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे. यामुळे ही शिकवण प्रत्येकाने आत्मसाद करूण जीवन सुखकर करावे असे त्यांनी सांगितले.त्याच बरोबर जैन बांधवांना त्यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह मा.नगरसेक सचिन जाधव, अजिक्य तळे, प्रशांत मुथ्था, कमलेश भंडारी आणि महावीर  ग्रुपचे  विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.

कामरगाव प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 कामरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी. नगर), श्री. संजय शिंदे (तहसिलदार. नगर), तसेच गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, केंद्र प्रमुख बाळासाहेब दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते सरस्वस्ती पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख अतिथींसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी  उपविभागीय अधिकारी श्री.सुधीर पाटील व तहसिलदार श्री. संजय शिंदे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कडून शाळेस देण्यात आलेल्या पाच एल. ई.डी. स्क्रीन चे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. 
कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत विदयार्थ्याना भौतिक व डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल  आनंद व्यक्त  करत इतर माध्यमांच्या शाळेच्या तोडीस तोड शाळा असल्याचे मत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नगरचे तहसिलदार श्री.संजय शिंदे यांनी कामरगाव शाळेतील विदयार्थ्याची गुणवत्ता व कलागुणांच कौतुक करत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण आवश्यक असल्याच मनोगत व्यक्त करत शाळेच्या पट संख्येबाबत व सुविधांबाबत कौतुक केले. तसेच दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  पत्रकार हेमंत साठे व शालेय व्यवस्थापन समितीच्या कामाचे देखील कौतुक केले.
      या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली. विविध ऐतिहासिक व आधुनिक  गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कलागुणांना वाव मिळतो. या विचारांना अनुसरून हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी सरपंच तुकाराम कातोरे, उपसरपंच पूजा संदिप लष्करे, ग्रा.पं. सदस्य.गणेश साठे, लक्ष्मण अण्णा  ठोकळ, हाबू शिंदे,संदिप ढवळे, सोसायटी चेअरमन सुनिल चौधरी, राजू राजगुरु संचालक मंगल ठोकळ, उद्योजक मनोज ठोकळ, ग्रामसेवक सुरेश मगर, तलाठी हर्षल करपे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं. सदस्य. अश्विनी ठोकळ, उप सरपंच अनिल आंधळे , सतिष, कातोरे, प्रशांत साठे, डॉ संदिप पवार, मुख्याध्यापिका भारती झावरे, शिक्षिका मंदाकिनी दावभट, शुभांगी क्षिरसागर, नंदा पठारे, लक्ष्मी गायकवाड, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शेरकर यांनी केले.

दिलदारसिंग बीर पुन्हा शिवबंधनात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश

 सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत दिलदारसिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीर यांनी शिवबंधन बांधले.
नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची नगर शहरात गांधी मैदानावर सांगता झाली. या कार्यक्रमात बीर यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी महाविकास आघाडीचे शरद पवार, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, विक्रम राठोड, माजी आमदार राजेंद्र आवळे, भूषणसिंह होळकर, राजेंद्र फाळके, भगवान फुलसौंदर, प्रताप ढाकणे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, दत्ता जाधव किरण डफळ, सतिश बल्लाळ आदी उपस्थित होते.
दिलदारसिंग बीर यांनी माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करुन आपल्या सामाजिक व राजकीय कारकीर्दची सुरुवात केली. 26 जानेवारी 2002 रोजी बागडपट्टीत पहिली शिवसेनेची शाखा सुरु केली. त्याचप्रमाणे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीर यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सर्वसामान्य नागरिक व युवकांशी जोडले गेले. तर शिवसेनेत शाखाप्रमुख ते उपशहरप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍न हाताळून शिवसेना वाढविण्याचे काम केले.2013 मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. 10 वर्ष राष्ट्रवादीत शहर जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली. मात्र पुन्हा त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशाचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

 

ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांचा निषेधओबीसींवरील अन्याया विरोधात लढा देणार- दिलीपराव खेडकर

  राज्यासह देशात ओबीसीचे मोठे संघटन छगनराव भुजबळ यांनी उभे केले, ओबीसींवर ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्या-त्या वेळी छगनराव भुजबळ यांनी पदाची तमा न बाळगता ओबीसींच्या हक्कासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले. प्रसंगी सरकारच्या विरोधातही भुमिका घेतली. अशा राज्यातील सर्व पक्ष, घटकांतील ओबीसींसाठी काम करणार्‍या छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची दिल्लीमधून चर्चा होती, परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शविणे ही निषेधार्थ बाब आहे. आज राज्यात लोकसभेची निवडणुक होत असतांना, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे जे लोक या प्रवृत्ती मागे आहे, त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहे. आम्हीही या अशा घटनेचे निषेध करुन ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मागे उभे आहोत. राज्यभर या घटनेने पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी सनदी अधिकारी  दिलीपराव खेडकर यांनी दिला आहे.ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणार्‍यांचा ओबीसी बहुजन आघाडीच्यावतीने माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी वामनराव भदे, राजेंद्र कोथिंबीरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथिंबीरे, आकाश वारे, संजय बेद्रे, एकनाथ खेडकर, आदिनाथ दहिफळे, नवनाथ खेडकर आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना दिलीपराव खेडकर म्हणाले, आज ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ओबीसींचे मजबूत संघटन राज्यात केले जात आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसींना डावल्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत, त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहे, त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरमधील अनेक पदाधिकार्‍यांनी ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांचा तीव्र शब्दात निषेध करुन या निवडणुकीतून ओबीसींची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज, अॅड. अभय आगरकरांनी दिली माहिती

अहिल्यानगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 
अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अभय आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम,माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 
अहिल्यानगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीला सुरवात करणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र, पक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले. 
सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने देशात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.