Thursday, 9 May 2024

*जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा -शंकरजी गायकर*

विश्व हिंदू परिषदेचा हिंदू जनसंवाद मेळावा उत्साहात*                                                                                                  
   नगर-देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकाने आपले अनमोल मत द्यावे.पाच वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक व राष्ट्र पुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करूनच देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.खऱ्या अर्थाने या देशाला हिंदुत्वाची परिभाषा कोणी शिकवली असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. देशासाठी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेची महाआरती तसेच अनेक ग्रंथ लिहून विश्वामध्ये हिंदुत्वाचे नाव अजरामर केले आहे.ही शूर वीरांची भूमी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,गुरुगोविंद सिंग,चन्नम्मा,झाशीची राणी,नेता सुभाष बोस,अहिल्यादेवी होळकर,भगतसिंग या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अबकी बार 400 चा आकडा पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.आज देशात लव जिहाद,व्होट जिहाद, धर्मांतरण,गोहत्या नक्षलवाद,आतंकवाद अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.तसेच काही धर्मांधांकडून व्होट जिहाद करण्यासाठी पत्रक बाजी करण्यात येत आहे. तर काही पक्षांकडून सरकार आले तर प्रभू श्रीरामाचे मंदिर पुन्हा झोपडीत बांधू अशाप्रकारे हिंदू संस्कृतीला व धर्माला हिनतेची वागणूक देण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात घडत आहेत.जर कोणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वाईट भावना मनात ठेवून हात लावण्याचा जरी विचार केला तर समस्त हिंदू समाज,बजरंग दल,व विश्व हिंदू परिषद त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.आज देशात 400 चा आकडा पार झाल्यास एकच मंत्र देण्यात येईल जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा !असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे.                                 

  पटेल मंगल कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू जनसंवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र -गोवा मुंबई क्षेत्राचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड.जय भोसले,शहराध्यक्ष विजयकुमार पादिर,जिल्हा मंत्री अनिल जोशी,विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी,भरत थोरात आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले. स्वागत व परिचय गजेंद्र सोनवणे यांनी करून दिला.सूत्रसंचालन भरत थोरात यांनी केले. तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,मातृ शक्ती,बजरंग दल,रा.स्व.संघ,विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 6 May 2024

संत किसनगिरी नगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ

श्रीमद् भागवत निष्ठेने श्रवण केल्यास सकल दुःखाचा नाश होऊन परमानंदाची प्राप्ती -साध्वी अनुराधा दीदी. 


प्रातःस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व व भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या परिसरात श्रीमद् भागवत कथेचे दिव्यचिंतन करीत आहोत.हजारो जन्माच्या मिळविलेल्या पुण्याने श्रीमद् भागवत कथा ऐकण्याची बुद्धी प्राप्त होते.ऋषीमुनींनी जे समृद्ध भंडार ठेवले आहे.ते आपण कथेच्या माध्यमातून श्रवण करावे. जीवनात व प्राप्त झाले तर कायमच टिकतील असे नाही.परमात्मा भगवंत प्राप्त झाले तर ते कायमचे प्राप्त होतात. श्रीमद् भागवत निष्ठेने जे श्रवण करतात त्यांचे सकल दुःखांचा नाश होतो.आणि परमानंदाची प्राप्ती होते.भवरोगाचे रामबाण औषध भागवत आहे. सत्संग म्हणजे काय आहे? ज्या संगाने भोगाचे महत्त्व कमी होते.ज्या संगाने परमात्मा भगवंत प्राप्त होतो. त्याला सत्संग म्हणतात, नामस्मरण करण्याची प्रेरणा निर्माण होते त्याला सत्संग म्हणतात.श्रीमद् भागवत हे मनोरंजनाचे साधन नाही तर मनोभंजनाचे साधन आहे. मनोज कृष्णमय कसे करायचे आहे हे शिकवणारे भागवत आहे. भोगाच्या दिशेने चाललेली दिशा भगवंताच्या दिशेकडे वळविण्यासाठी श्रीमद् भागवत हे शास्त्र आहे.असे निरूपण भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी प.पू.अनुराधा दीदी यांनी पहिले पुष्प गुंफताना केले आहे.पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी संत किसनगिरी नगर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.श्रीमद् भागवत ग्रंथाचे पालखीत पूजन करून तसेच वारकरी भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.महिलांनी फुगडीचा फेर धरला,परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी यांची बगीतून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतून न ठेवता आनंददायी शिक्षण द्यावे.सततच्या अभ्यासाने मुलांवर अभ्यासाचा ताण येतो.मुलांना वेगवेगळ्या खेळण्यातून, कृतीतून शिक्षण द्यावे.उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.दादा चौधरी मराठी शाळेत चांगल्या प्रकारे धमाल छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुलांना भरपूर फायदा झाला आहे. या शिबिरात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते.तसेच डिसेंबर महिन्यातही अशा प्रकारे शिबिर घ्यावे.अशी मागणी विद्यार्थ्यांनी करावी.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्या प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत तीन वर्ष ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीला महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गिरी व विश्रामबाग शाळेच्या बालवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका वर्षा चिखले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,कार्यकारणी सदस्य प्रा.ज्योतीताई कुलकर्णी,दादा चौधरी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.नंदा कानिटकर,मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे ,दिलीप परसपाटकी आदि उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शिबिराच्या माध्यमातून अत्यंत चांगले शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचे मनोरंजन,खेळ,तसेच व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी प्रेरणादायी चित्रपट हंबीरराव मोहिते दाखविण्यात आला आहे. या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. धमाल छंद वर्गात अकरा दिवसात शिकवलेल्या उपक्रमापैकी नृत्य सादरीकरण दोन गटात करण्यात आले.अनुष्का चंगेडिया या विद्यार्थिनीने भरतनाट्यम नृत्य सादर केले. कु‌.आर्या उपरे, रचना कनोरे,सारंगा कुलकर्णी, गौरव बेद्रे,शेळके या विद्यार्थ्यांनी मनोगत सादर केली.प्रास्ताविक सुभाष येवले म्हणाले, शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.दर शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली वाळुंजकर यांनी केले.तर आभार दिलीप परसपाटकी यांनी मानले.या शिबिर यशस्वीतेसाठी शाळेतील मंगल पवार,गणगले मॅडम, वाकचौरे मॅडम,देवराव मॅडम, प्रिया अहिरे,रुचिता मॅडम,वैशाली डफळ आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.